"रघुवीर भोपळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
‘’’रघुवीर भिकाजी भोपळे’’’ऊर्फ “’जादुगार रघुवीर’’’(जन्म :२४ मे १९२४, मृत्यू : २० ऑगस्ट १९८४) हे महाराष्ट्रातीलआंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते.ओ.पी.शर्मातसेच बंगालमधील पी सरकार हे जादूगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.
[[File:Magician Raghuvir in his School of Magic.jpg|thumb|जादूगार रघुवीर ]]
==कौटुंबिक माहिती==
रघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी मुळशी धरणाजवळच्या कादव या गावात झाला.मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील चाकण जवळील आंबेठाण येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.
==बालपण व शिक्षण==
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यानी पुण्याचे अनाथ विद्यार्थिगृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) या वसतिगृहात शिक्षणासाठी प्रवेश घेतला.माधुकरी मागून त्यांनी आपले उदरभरण केले.कठीण परिस्थिती कुटुंबियांपासून दूर राहून त्यांनी मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची उंची ६ फूट २ इंच व डोळे निळे होते , म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त वाटत असे.
==व्यावसायिक कारकीर्द==
‘जादू’या शब्दाची विलक्षण जादू पुरातनकाळापासून सर्वच देशामधील लोकांच्यावर पडलेली आहे.पूर्वी मदारी किंवा तत्सम फिरस्ते आपली हातचलाखी रस्त्यावर दाखवीत असत.‘राणा’ या राजस्थानी जादूगाराचा खेळ त्यांनी रस्त्यावर एकदा पाहिला.राणाकडून जादूची ही कला त्यांनी शिकून घेतली.त्यानंतर सुमारे ८० वर्षांपूर्वी त्यांनी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गायिका हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांची कला पाहून त्यांना आफ्रिका दौऱ्यावर सोबत नेले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनीजादूचा खेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारला.पुणे येथील शकुंतला पटवर्धन यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला.शकुंतलाताई पण त्यांच्यासोबत जादूचे प्रयोग करत असत.त्या ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम सादर करीत असत.विजय व संजय ही त्यांची दोन मुलेही प्रयोगात असत.त्यांनी व शकुंतलाताई यांनी धनुर्विद्या आत्मसात केली होती.एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे बाणाच्या साहाय्याने हार घालून स्वागत केले होते.