"बालमणी अम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
नालापट बालमणी अम्मा (१९ जुलै १९०९ ते २९ सेप्टेंबर २००४) ह्या आधुनिक मलयाळम् कवयित्री होत्या.त्या एक मातृत्वाच्या कवयत्री म्हणून ओळखल्या जात. तसेच त्यांनी लिहलेल्या अम्मा (आई), मुथासी (आजी) आणि माझुविंटे या कथा खूप गाजल्या होत्या.त्यांना खुपसे अवार्ड्स मिळाले आहेत त्यामध्ये पद्मश्री भूषण अवार्ड देखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे .
==जीवन परिचय ==
त्यांचा [[जन्म]] मलबारमधील पुन्नयूरक्कुळम् (ता. वन्नेरी) येथे. त्यांचे [[माता]]-[[पिता]] कोच्चुअम्म व चिट्टन्नूर कुंजुण्णी राजा अशी नावे होती आणि पती कै. एम्. व्ही. नायर. मातृभूमि या नियतकालिकाचे कै. नायर हे प्रदीर्घ काल कार्यकारी संचालक होते. बालमणी अम्मा यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही पण त्यांनी घरीच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण घेतले.नालप्पाट्टू नारायण मेनन हे मल्याळम् कवी व लेखक त्यांचे [[मामा]] होत. असा साहित्यिक वारसा लाभलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण व्यतीत झाले. माधवी कुट्टी (कमला दास) ह्या बालपणी अम्म यांच्या कन्या असून त्यांनी मलयाळम्मध्ये कथा-कादंबरीलेखन आणि [[इंग्रजी]]<nowiki/>त कवितालेखनही केले.
|