"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास आणि संस्कृती: छायाचित्र जोडले #WPWP
→‎top: दुवे जोडले. टंकनदोष
ओळ २५:
गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबा बाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील ब-याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.
 
मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी [[मुकुंदराज]] यांनी विवेकसिंधु या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. [[नागनाथ कोत्तापल्ले|नागनाथ कोतापल्ले]] यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली. 
राज्य शासन मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्यांना मराठी भाषेची जननी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचा विसर पडलेला आहे. राज्यातील भाषा तज्ञांनी मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले असून याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. आद्यकवी मुकुंदराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे.त्यांनी विवेकसिंधू सारख्या महान ग्रंथाची रचना याच भूमीत केली.
 
== इतिहास आणि संस्कृती ==
ओळ ४९:
अंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर समजले जाते. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३२ साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आजही या संस्थेचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दबदबा आहे. या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.
 
दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये श्री. वैद्येवैद्य काका, खारकर गुरुजी, धायगुडे गुरुजी आणि कोदरकर गुरुजी या [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक]] संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. ही मराठवाड्यातील क्रमांक दोनची संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात.
 
[[ज्ञान प्रबोधिनी]],अंबाजोगाई हे ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबाजोगाईत कार्यरत आहे. प्रसाद चिक्षे हे सध्याचे केंद्र प्रमुख म्हणून त्याचे काम पाहतात.
 
[[वर्ग:बीड जिल्हा]]