कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण [[पांडव|पांडवांच्या]] बाजूने लढला. [[महाभारत|महाभारतात]] म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा [[क्षत्रिय]] नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर [[राजसूय यज्ञ|राजसूय यज्ञात]] पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
==देव कोणतेही काम करीत नाही==
लोक विचारतात, जर श्रीकृष्ण स्वतःला देवाचा अवतार मानत होता, तर त्याने शिशुपालाला मारले जसे महाभारत युद्धात उतरलेल्या सर्व कौरव सैन्याला आणि जगातील सर्व वाईट प्रवृत्तीच्या लोकांना मारून का टाकले नाही? तर उत्तर असे आहे की, देव स्वतः काही काम करीत नाही, फारतर तो काम करणाऱ्याचा साथीदार असतो. मुलांनी चांगला अभ्यास केला नाही तर त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळवून द्यायला देवाची प्रार्थना उपयोगी पडत नाही. देव फारतर अभ्यास करणाऱ्या मुलाच्या बरोबर बसेल आणि त्याला मदत करेल. व्यायाम न करता फक्त देवाची पूजाअर्चा करून आणि देवाच्या विनवण्या करून चांगले आरोग्य मिळणार नाही, त्यासाठी व्यायामच करायला हवा. समृद्धी मिळवण्यासाठी धार्मिक पूजापाठ, आरत्या उपयोगी पडत नाहीत, त्यासाठी माणसाने स्वतः करीत असलेले काम मन लावून उत्तम रीतीने केले पाहिजे. पायाभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून आणि निव्वळ देवाचा जप करून माणसाच्या क्षमतेत भर पडत नाही. देव अशाच लोकांना मदत करतो जे स्वतःला मदत करतात.