बोरकरांनाबोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना [[वडोदरा|बडोद्यातील]] वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी [[गोवा मुक्तिसंग्राम|गोव्याच्या मुक्तिसंग्रामात]] उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.