"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७३:
मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर [[पाषाणयुग]]ापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख [[ग्रीक]]ांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे [[सम्राट अशोक]]ाच्या [[मौर्य]] साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या [[हिंदू]] साम्राज्याने [[इ.स. १३४३|१३४३]] पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर [[गुजरात]]च्या [[मुस्लिम]] साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. [[एलिफंटा आयलंड|एलिफंटा गुंफा]] व [[वाळकेश्वर मंदिर]] ही याच काळातील आहेत. [[इ.स. १५३४|१५३४]] साली [[पोर्तुगीज]]ांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस ''बॉम बाहीया'' असे नाव दिले. [[इ.स. १६६१|1661]] रोजी [[पोर्तुगीज]]ांनी मुंबई [[इंग्लंड]]चा राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली{{संदर्भ हवा}} व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीस]] भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.
 
मुंबईमध्ये [[कोळी समाज]]ातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत जसे  [[माहीम]], [[शीव]] ([[सायन]]), [[धारावी]], [[कुलाबा]], [[वडाळा]], [[शिवडी]], [[वरळी]], [[वेसावे]], [[कफ परेड]], [[मांडवी]], चारकोप, [[बंदरपखडीबंदरपखाडी]],  [[खार]], [[चिंबई]], [[गोराई]], [[मालाड]], [[मढ किल्ला|मढ]], वगैरे.
[[चित्र|इवलेसे|कोळी लोक.]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले