"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ३:
संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिना कालिदासांचा महिना म्हणून साजरा होतो. कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात.
कालिदास यांच्याविषयी सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृतचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मितीविषयी उत्सुकता आहे. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांची आषाढातील त्यांच्या ‘मेघदूता’मुळे श्रावण आठवण न होणे शक्यच नाही.
कालिदासांच्या नावावर जवळजवळ ३० साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी ७ महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्यांचे स्थान अतिउच्च कोटीतले आहे. त्यांच्या ऋतुसंहार’ कुमार संभवम रघुवंशम मेघदुतम या कालेषु रचनाम तसेच मलाविकाग्नी मित्र विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृतमधील नाटय़-कम-महाकाव्य रचनेमुळे जाऊन त्यांना संस्कृत विद्वान म्हणून भारतभूमीत मान्यता मिळाली. तसेच ती जगभरात पसरली. साहित्यविश्वात अजरामर झाला. त्यामधील कुमार संभव रघुवंश ही दोन महाकाव्ये, मेहदूत आणि ऋतुसंहार अशी दोन खंडकाव्ये आहेत.
ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने फार लहान आहे. त्या त्यांच्या दीर्घ निसर्गकाव्याचे सहा भाग आहेत. रायडर हे ऋतुसंहारला सवअमे बंसमदकंत म्हणतात. निसर्गसौंदर्यामुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न बघतो त्याला या जादुभ-या ऋतुचक्राच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे.
कुमारसंभवम हे प्रसिद्ध पाच त्यांच्या महाकाव्यातील सुंदर, संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी ‘सिवाला’ वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केलेले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुदंरतेचे शृंगारिक वर्णन आहे. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते.
== पूर्व जीवन ==
|