"आषाढ शुद्ध नवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस|आषाढ|शुद्ध|नवमी|नववी}}
 
हिला कांदे [[नवमी]] किंवा भडली नवमी म्हणतात.
 
यादिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासात कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार वर्ज्य असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी होते. पावसाळ्यात कांदा सडल्यासारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज्य केलेला आहे. तसेच वांगीदेखील वर्ज्य असतात.
 
यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जातोच जातो. एकेकाळी हे नियम प्रामाणिकपणे लागू व्हायचे. कोणाच्याही घरातून कांदा, लसणाचालसणाच्या फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यच नव्हते. म्हणून कांदे [[नवमी]]च्या दिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. कांद्याची भजी-भाजी-कोशिंबीर, थालपीठे, झुणका, कांदे पोहे, कांदे घातलेला फोडणीचा भात वगैरे खाऊन हा दिवस साजरा होतो.