"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Indianmaratha (चर्चा | योगदान) {{cn}} |
Indianmaratha (चर्चा | योगदान) बालपण आणि जीवन खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
ओळ ६:
| चित्र = Bal Thackeray at 70th Master Dinanath Mangeshkar Awards (1) (cropped).jpg
| चित्र_आकारमान =
|
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
ओळ ५४:
| संकीर्ण =
}}
'''बाळ केशव ठाकरे''' ऊर्फ '''बाळासाहेब ठाकरे''' ([[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]]; [[पुणे]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]; [[मुंबई]]) हे महाराष्ट्रातील [[शिवसेना]] पक्षाचे [[संस्थापक]], राजकारणी व व्यंगचित्रकार होते. [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
== बालपण आणि जीवन ==
२३ जानेवारी, [[इ.स. १९२७]] मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, [[पुणे]] येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील [[केशव सीताराम ठाकरे]] ऊर्फ [[प्रबोधनकार ठाकरे]] त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील]] त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला होता. {{CN}}
== व्यंगचित्रकार ==
सर्वप्रथम एक [[कलाकार]] म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९५०]] मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये [[व्यंगचित्रकार]] म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार [[आर.के. लक्ष्मण]] यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-[[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]]-[[जाहिरात|जाहिरातीचे]] डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.<ref name="bbc._बालठ">{{Cite websantosh |
== 'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक ==
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून
== शिवसेनेची स्थापना ==
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - [[व्यंग]] केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….....[[शिवसेना]].........यानंतर बाळासाहेबांनी [[जून १९]], [[इ.स. १९६६]] रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[भारत|भारतात]] मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी [[शिवसेना|शिवसेनेच्या]] माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला [[मेळावा]] [[ऑक्टोबर ३०]], [[इ.स. १९६६]] रोजी [[शिवाजी पार्क|शिवतीर्थ]]
== ''सामना'' ==
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. [[केशव सीताराम ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]] व [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘[[सामना (वृत्तपत्र)|सामना]]’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील [[संपादक]] बाळ ठाकरे यांच्या [[अग्रलेख|अग्रलेखांची]] वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असे.कालांतराने सामना हे वृतपत्र सृष्टीतील मुख्य वृत्तपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले .
== शिवसेना - भाजप युती ==
[[शिवसेना]]प्रमुख बाळासाहेब व [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]] चे दिवंगत नेते [[प्रमोद महाजन]] यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे [[इ.स. १९९५]] मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि [[मनोहर जोशी]] हे शिवशाहीचे पहिले [[मुख्यमंत्री]] बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
== हिंदुत्व ==
[[हिंदुत्व]] या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते.
== राजकीय कार्य ==
{{दृष्टिकोन}}
[[झुणका]]-[[भाकरी|भाकर]] केंद्रांची योजना, [[वृद्धाश्रम|वृद्धाश्रमांची]] साखळी, वृद्धांना सवलती, [[झोपडपट्टी]]वासीयांना [[घर|घरे]], [[मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग]], मुंबईतील [[उड्डाणपूल]], Bombayचे Mumbai असे स्पेलिंग... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. [[व्हॅलेन्टाईन्स डे|व्हॅलेंटाईन डे]] सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी [[राजकारण|राजकारणात]] (सत्ताकारणात) [[जात]] या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
जातीपातींचे राजकारण, [[सहकारी संस्था]] - [[साखर कारखाना|साखर कारखाने]] स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची [[नस|नाडी]] ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. [[मनोहर जोशी]], [[सुधीर जोशी]], [[प्रमोद नवलकर]], [[मधुकर सरपोतदार]], [[छगन भुजबळ]], [[सुरेश प्रभु]], [[आनंद दिघे]], [[दत्ताजी नलावडे]],.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख '''[[उद्धव ठाकरे]]''' तसेच [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना|महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे]] अध्यक्ष '''[[राज ठाकरे]]''' यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे.
अनेक नेते येतात आणि जातात. [[निवडणूक]], [[प्रचार]], [[पद]], [[पैसे|पैसा]] आणि शेवटी एखादा [[पुतळा]] एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा [[योद्धा]] मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.{{वाद}}
== निधन ==
बाळ ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी [[भाप्रवे]]नुसार १५:३० वाजता [[मुंबई]]त ''मातोश्री'' या निवासस्थानी निधन झाले <ref name = "आयबीएन लोकमत २०१२१११७">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=265512 |
== ठाकरेंवरील प्रकाशित साहित्य==
Line ९४ ⟶ १०५:
==बाह्यदुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/shiv-sena-chief-bal-thackeray-is-no-more/ |
▲* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/shiv-sena-chief-bal-thackeray-is-no-more/ | title = शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}
{{कॉमन्स वर्ग|Bal Thackeray|{{लेखनाव}}}}
|