"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''तथागतांनी सांगीतलेली पाच विषे अर्थात‘बहुजन हिताय बहुजन सुखाय...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
No edit summary
ओळ १:
== '''तथागतांनी सांगीतलेली पाच विषे अर्थात‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मार्गातले पाच अडथळे''' ==
 
 
ओळ ८:
तथागतांनी 2600वर्षापुर्वीच सदाचार मार्गातील तसेच अंतीम सत्याकडे मार्गक्रमण करू पाहणा-या मनुष्यास येणा-या पाच अडथळयांवरील,बंधनावरील उपाय सांगीतलेले आहेत हे पाच अडथळे किंवा बंधने म्हणजेच धम्ममार्गातील पाच विषे होत. हि पाच विषे ध्यानाव्दारे नष्ट करता येतात.ती पाच विषे म्हणजेच 1) अस्थिरता,चंचल वृत्ती म्हणजेच अस्थैर्य 2) तृष्णा3)व्देश 4) मान,अहंकार 5) अविदया ही ती पाच विषे होत यावर तथागतांनी उपायही सांगीतलेला आहे. तो येणे प्रमाण केल्यास ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असेच होईल
 
=== '''1)अस्थिरता,किंवा अस्थैर्य:-''' ===
'''1)अस्थिरता,किंवा अस्थैर्य:-''' अस्थैर्य किंवा अस्थिरता म्हणजेच धरसोडवृत्ती,जीवनात किंवा कोणत्याही कामात मन नसणे ह्यावर उपाय म्हणजेच आनापान सती ध्यान या ध्यानाने चित्ताची एकाग्रता होवुन चित्त कुशलावर व केवळ कुशलावर एकाग्र होते.बुध्दप्रवाहाचा प्रवाह मानसाच्या जीवनात प्रवाहीत होतो.माणसाचे जीवन ज्ञानाच्या प्रकाषाने प्रवाहीत होवुन सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाल्यामुळे 1)चख्खु उद्पात्रीत्र्त्राण,2)उदापात्री पत्र्त्रा,3)उद्पादी,4)विज्जाउद्पादी,5)आलोका उद्पादी म्हणजेच 1)धम्मचक्षुचा उदय,2)ज्ञानाचा उदय, 3)प्रज्ञेचा विकास,4)विदयेचा उदय,5)प्रकाषाचा उदय होतो.अशा प्रकारे माणसाची प्रबुध्द मानव होण्याची क्षमता या ध्यानात आहे. आनापान सती ध्यान म्हणजेच बुध्दत्वावर मन केंद्रीत करणे त्याने जीवन व मानवी मन सागरासारखे सुंदर व प्रशांत होते तर, आकाशासारखे विस्तार पावते. विश्व कवेत घेण्याची क्षमता या ध्यानात आहे.
 
=== '''2)तृष्णा:-''' ===
'''2)तृष्णा:-''' तृष्णा  हीच तर मानवाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडते.तृष्णा तिन प्रकारची आहे 1) काम तृष्णा2) भव तृष्णा3) विभव तृष्णा पुन्हा या तिन प्रकारच्या तृष्णेचे दोन भागात विभाजण होते 1)लौकीक अन 2) अध्यात्मीक म्हणजेच तृश्णा हया सहा प्रकारच्या झाल्या या सहा प्रकारच्या तृष्णा शडायतन मध्ये गेल्यास 36 तृष्णा होतात षडायतन म्हणजेच सहा इंद्रिये होय यातील पाच तर ज्ञानेंद्रीय (कान,नाक,डोळा,जिभ आणि त्वचा) व एक मानसीक म्हणजेच आपले मन होय.अश्या या 36 तृष्णा तिन काळामध्ये मिळुन एकुण 108तृष्णा होतात. हे जर माणसाला समजले तर नित्य सम्यक व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे समजेल.(तृष्णा3X2X6X3 =108)त्यासाठी 108 रूद्राक्षाच्या माळेची गरज नसुन तृष्णा म्हणजेच आग होय. ही आग विझवण्यासाठी ध्यान धारणा करणे आवष्यक आहे.त्यासाठी शरीरातील बत्तीस भागांवर अशुभाची भावना करणे (अ)प्रेताच्या दहा अवस्थांवर चिंतन करणे आणि (ब) स्मशानावरील ध्यान करणे हे दोन्ही ध्यान करण्या अगोदर स्वतःवर खुप मैत्री केली पाहिजे अन्यथा निराशा व स्वतःप्रतीच घृणा निर्माण होते. रितसर व स्वतःवर मैत्री असल्याने शरीरातील बत्तीस भागावर अशुभाची भावना करीत हे दोन्ही ध्यान केल्याने तृष्णा कमी होते.
 
=== '''3)व्देशः''' ===
'''3)व्देशः'''-व्देशावरील उपाय म्हणजेच मैत्री ध्यान होय.मैत्रीभावना व मेत्ताभावना,स्वतःवर मित्रावर, त्रयस्थावर, व शत्रुवर मैत्री या प्रमाणे क्रमाक्रमाणे तिचा विकास करीत विश्वातील सर्व सजीवांवर मैत्री करणे हा मैत्री ध्यानाचा उद्येश असल्याने मानवाच्या विधायक भावना अधिक उन्नत होवुन विस्तारीत जाते.मानव इतरांप्रती व स्वतःप्रती जागृत राहुन संवेदनशील बनतो.त्याचा तरतम्यभाव नष्ट होतो.समतेच्या अभिवृध्दीसाठी मैत्रीध्यान आवश्यक आहे.
 
=== '''4)अहंकार व मान:-''' ===
'''4)अहंकार व मान:-''' अहंकार व मान घालवण्यासाठी अनित्य व अनात्मवादाचा सिध्दांत समजावुन घेणे गरजेचे आहे.त्यासाठी सहा धातुंवरील ध्यान करणे महत्वाचे आहे हे सहा धातु म्हणजेच ज्याच्या मुळे आपले शरीर बनले आहे 1)पृथ्वी 2)आप म्हणजेच पाणी 3) तेज म्हणजेच उर्जा 4)वायु 5) अवकाश किंवा पोकळी 6) विज्ञान आपले अस्तीत्व हे स्वयंभु नसुन ते प्रकृतीतील या सहा घटकांपासुन बनलेले आहे तसेच त्याचा विलय सुध्दा या सहा घटकांतच होतो. हे पुर्ण सत्य जाणुन ध्यान करणे.‘मी’ म्हणजेच स्वयंभु आहे. आत्मा आहे हीच भावना या ध्यानाने नष्ट होते आणि आपले खरेखुरे दर्शन या ध्यानभावनेमुळे होते.त्यामुळे संसाररूपी चक्रातले आपले अस्तीत्व आपला मान,अहंकार,गर्व,अभिमान नष्ट होतो.
 
<br />
 
=== '''5)अविद्या:''' ===
'''5)अविद्या:-'''अविद्या म्हणजेच अज्ञान महात्मा फुले यांनी अज्ञाना बद्यल बोलताना म्हटले आहे की ‘‘विदये विना मती गेली,मती विना निती गेली,निती विना गती गेली,गती विना वित्त गेले,वित विना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.’’या अविद्ये वरील उपाय म्हणजेच बारा निदानाचे ध्यान होय.मानवी जीवनाला ना सुरूवात आहे ना अंत आहे ती एक वर्तृळाकार प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वेगाने घडयाळा प्रमाणे फिरते या वर्तुळाकार फिरणा-या चक्रालाच भवचक्र,संसारचक्र,जीवनचक्र असे म्हणतात. याला अशोकचक्र असेही संबोधतात याला चोवीस कडया,आ-या आहेत.अंधारातील अविदया ते दुःख या पर्यंत बारा आ-या आहेत तर प्रकाषातील दुःख ते निर्वाण पर्यंत बारा आ-या आहेत.मानवाच्या जीवनात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक अधोगतीचा अन दुसरा प्रगतीचा मार्ग.प्रगतीच्या मार्गाने गेल्यास मानवास निर्वाण प्राप्त होते.