"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
"Bali" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
खूणपताका: आशय-बदल सुचालन साचे काढले आशयभाषांतर ContentTranslation2
ओळ १:
 
{{बदल}}
[[चित्र:Flag of Bali.svg|200px|right|अल्ट=ध्वज|बालीचा प्रांतीय ध्वज]]
 
'''बाली''' हा [[इंडोनेशिया]] देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.[[जावा|जावाच्या]] पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावेश होतो.बालीची राजधानी असलेले [[देनपसार|डेनपसार]] हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sp2010.bps.go.id/index.php/site/tabel?tid=321&wid=0|title=Penduduk Menurut Wilayah serta Agama yang Dianut|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=}}</ref>
 
 
बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे.१९८०<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=y17MAgAAQBAJ&redir_esc=y|title=Bali: A Paradise Created.|last=|first=|publisher=Tuttle Publishing|year=13 August 2013|isbn=ISBN 9781462900084.|location=|pages=}}</ref> पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथच आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँँक समूहाची वार्षिक सभा झाली होती. २०१७ साली ट्रीप अडवाईझर् संस्थेतर्फे बालीला पर्यटकांच्या आवडतं ठिकाण म्हणून सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ घोषित केले.<ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://www.nzherald.co.nz/travel/news/article.cfm?c_id=7&objectid=11823142|title="Bali named as best destination in the world by TripAdvisor".|publisher=|year=22 March 2017|isbn=|location=|pages=}}</ref>
 
बाली हा त्या [[प्रवाळ त्रिकोण|प्रवाळ त्रिकोणचा]] भाग आहे, जो सागरी प्रजातीच्या सर्वाधिक जैवविविधतेचा भाग आहे ज्यात मुख्यतः मासे आणि कासवांचा समावेश आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=-wDJBQAAQBAJ&redir_esc=y|title=Arguments for Protected Areas: Multiple Benefits for Conservation and Use.|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> युनेस्को [[जागतिक वारसा स्थळ]] असलेली [[सुबक सिंचन व्यवस्था]] <ref>{{स्रोत बातमी|last=|first=|url=https://www.abc.net.au/news/2012-06-27/an-balis-subak-world-heritage-listed/4096016|title="World heritage listing for Bali's 'Subak' tradition".|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>बालीचीच आहे.तसेच १० पारंपारिक बालीच्या राजघराण्यांचा राज्यांचा एकसंध संघसुद्धा बालीतीलच आहे ज्यांचं वेगवेगळ्या भागांवर अधिपत्य आहे. हा एकसंध संघ बालीच्या राज्याचा उत्तराधिकारी आहे. ह्या घराण्यांना इंडोनेशियन सरकार मान्यता देत नाही, मात्र ही घराणी डचांच्या शासनाच्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत.
 
== इतिहास ==
 
=== प्राचीन ===
इसवी सन पूर्व २००० मध्येच [[ऑस्ट्रोनेशियन भाषासमूह|ऑस्ट्रोनेशिअन लोक]] जे तैवानहून [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियात]] स्थलांतरित झाले. सांस्कृतिक आणि भषिकदृष्ट्या बालीचे लोक इंडोनेशिअन द्वीपसमूह, मलेशिया, फिलीपिन्स व ओशोनियातील लोकांशी घनिष्ठरित्या संबंधित आहेत. या काळातील दगडी हत्यारे पश्चिमेकडील बेटावरील सेकिक ह्या गावात आढळली आहेत.
 
प्राचीन काळी बालीमध्ये पाशुपत, भैरव, शिव सिद्धांत, वैष्णव, बोध, ब्रह्म, रेसी, सोरा आणि गाणपत्य असे नऊ पंथ अस्तित्वात होते. प्रत्येक पंथ एका विशिष्ट देवास पूजित असे.
 
इसवी सन ८९६ आणि ९११ साली सापडलेल्या शिलालेखांत कोणत्याही राजाचा उल्लेख आढळत नाही. मात्र इसवी सन ९१४ साली सापडलेल्या शिलालेखात राजा श्री केसरीवर्माचा उल्लेख आढळतो. ह्या शिलालेखातून भिन्न बोली असणार्या स्वतंत्र बालीचा उल्लेख आढळतो जेथे बौद्ध व शैव पंथ प्रचलित होते. इसवी सन ९८९ साली, म्पू सिंदोक( श्री ईशान्य विक्रमधाममत्तुंगदेव ) च्या नातीचा महेंद्रदत्ताचा( गुणप्रियधर्मपत्नी ) विवाह बालीचे राजा उदयन वर्मादेव( धर्मोदयनवर्मादेव ) यांच्याशी झाला. इसवी सन १००१ साली, ऎरलंगचा जन्म झाला. या विवाहामुळे बालीमध्ये हिंदू धर्म अधिक दृढ झाला. इसवी सन १११५ ते १११९ सुराधिपने राज्य केले, तर इसवी सन ११४६ ते ११५० पर्यंत जयासक्तीने राज्य केले. शिलालेखांत जयपंगुचा उल्लेख ११७८ ते ११८१ च्या आसपास येतो, तर आदिकुंतिकेतू आणि त्याचा पुत्र परमेश्वरचा उल्लेख १२०४ साली आढळतो.
 
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून, बालीय संस्कृतीवर भारतीय, चीनी आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचा अधिक प्रभाव आहे. बाली द्वीप हे नाव अनेक शिलालेखांत आढळते, जसे की, इसवी सन ९१४ सालीचा श्री केसरी वर्मादेवाचा ब्लान्जोंग स्तंभलेख ज्यात बालीचा उल्लेख वाली द्वीप असा आहे. ह्या काळात येथील लोकांनी भातशेती लागवडीकरिता सुबक नावाची मिश्र सिंचन व्यवस्था विकसित केली. अशा काही धार्मिक व सांस्कृतिक परंपरा ज्या या काळात प्रचलित होत्या त्या आजही बालीत अस्तित्वात आहेत.
 
पूर्व जावातील मजापहित साम्राज्याने ( इसवी सन १२९३-१५२० ) १३४३ साली बालीमध्ये वसाहतीची स्थापना केली. १५२० साली, मजापहित साम्राज्याच्या अस्तंगतावेळी जावानिवाश्यांनी मोठ्याप्रमाणात बालीत स्थलांतर केले. यानंतर बालीचे शासन हिंदू राज्यांचे स्वतंत्र संकलन झाले, यामुळेच बालीय राष्ट्रीयता निर्माण झाली आणि संस्कृती, कला व अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्या. बाली राष्ट्र म्हणून पुढील ३८६वर्षे म्हणजे १९०६ पर्यंत स्वतंत्र राहिले. त्यानंतर स्थानिकांचा पराभव करून डचांनी बालीची सत्ता काबीज केली.
 
=== पोर्तुगीजांशी संपर्क ===
जेव्हा बालीच्या उत्तर किनार्यावर ॲंटोनियो अब्रेयु आणि फ्रान्सिस्को सेर्राओ संचलित पोर्तुगीज मोहिम धडकली, तेव्हा १५१२ साली पहिल्यांदा बालीचा संपर्क युरोपियांशी झाला. १५१२ साली समुद्री मोहिमेत फ्रान्सिस्को रोड्रिगेसच्या तक्त्यात बालीचा नकाशा तयार करण्यात आला. १५८५ साली, एक जहाज बुकित द्वीपकल्पावर पोहोचले आणि काही पोर्तुगीजांना राजा देव अगुंगच्या सेवेत सोडून गेले.
 
== भूगोल ==
<br />
== हवामान ==
बाली विषुववृत्तापासून दक्षिणेला केवळ ८ अंशांवर असूनसुद्धा बालीत वर्षभर सम हवामान असते. येथील वार्षिक सरासरी तापमान हे ३०°सेल्सियस इतके असते तर आर्द्रतेची पातळी ८५% इतकी असते.
[[वर्ग:इंडोनेशियाचे प्रांत]]
[[वर्ग:इंडोनेशियाची बेटे]]
दिवसा समुद्रसपाटीपासूनच्या कमी अंतरावरील तापमान २० ते ३३°से. एवढे असते, मात्र जसजशी समुद्रसपाटीपासूनची उंची वाढते तसतसे तापमान कमी होते.
 
== जैवविविधता ==
<br />
== पर्यावरण आणि प्रदूषण ==
प्रत्येक वर्षी लेबिहा समुद्रकिनाऱ्यावर जमिनीची धूप होते, ज्यामुळे ७ मीटर (२३ फीट) पर्यंत जमिनीचे नुकसान होते. याला सर्वात वाईट जमिनीची धूप असे म्हटले जाते. हा समुद्रकिनारा १०,००० पेक्षा अधिक भाविक तीर्थयात्रा करण्यासाठी वापरायचे आता ते मास्केटी समुद्रकिनाऱ्यावर हलविले आहेत.२०१० च्या पुनरावलोकन अनुसार बाली चा वतावरणिक गुणवत्ता निर्देशांक ९९.६५ होता आणि इंडोनेशिया च्या ३३ प्रंतांमधून बाली ने ३ क्रमांक पटकावला.पर्यटकांच्या अतिरेकामुळे येथील ४०० पैकी २०० नद्या आटल्या आहेत, पर्यटन व्यवसाय इथला मुख्य व्यवसाय देखील आहे,आणि एका संशोधना अनुसार बाली च्या दक्षिणी भागात पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न देखील उदभवू शकतो.
 
मागील वर्षी बाली येथे जवळ जवळ ५-७ दशलक्ष पर्यटकांनी हजेरी लावली. २०१७ च्या शेवटाला येथे कचरा आणीबाणी जाहीर करण्यात आली कारण येथे ३.६ मैलांपर्यंत समुद्रकिनारा वर प्लास्टिक समुद्री लाटांमुळे येत होते. या सगळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.[[इंडोनेशिया]] हे जगातील सर्वात वाईट प्रदूषण करणाऱ्यांपैकी एक देश मानला जातो, हा देश जगातील १०% इतके प्लास्टिक प्रदूषण करतो,इथली राजधानी जकार्ता येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता बघायला मिळते.
 
== प्रशासकीय विभाग ==
बाली हा प्रांत आठ विभाग आणि प्रत्येकी राजधानी असा विभागण्यात आला आहे. ती माहिती क्षेत्र आणि लोकसंख्येसह-
{| class="wikitable sortable"
!नाव
!राजधानी
!क्षेत्र किमी²
मध्ये
!लोकसंख्या
२०००च्या
 
जनगणनेनुसार
!लोकसंख्या
 
२०१०च्या
 
जनगणनेनुसार
!लोकसंख्या
२०१५च्या
 
जनगणनेनुसार
!मानवी विकास निर्देशांक
२०१४ चा अंदाज
|-
|देनपसार शहर
|देनपसार
|१२७.७८
|५,३२,४४०
|७,८८,५८९
|८,७९,०९८
|०.८१६ (खूप जास्त)
|-
|बाडुंग विभाग
|मंगुपुरा
|४१८.५२
|३,४५,८६३
|५,४३,३३२
|६,१५,१४८
|०.७७९(जास्त)
|-
|बांगली विभाग
|बांगली
|४९०.
|१,९३,७७६
|२,१५,३५३
|२,२२,४७४
|०.६५७ (मध्यम)
|-
|बुलेलेंग विभाग
|सिंगराजा
|१३६४.७३
|५,५८,१८१
|६,२४,१२५
|६,४५,८९३
|०.६९१ (मध्यम)
|-
|गिअन्यार विभाग
|गिअन्यार
|३६८.००
|३,९३,१५५
|४,६९,७७७
|४,९४,७२९
|०.७४२ (जास्त)
|-
|जेंब्राना विभाग
|नेगारा
|८४१.८०
|२,३१,८०६
|२,६१,६३८
|२,७१,४२३
|०.६८६(मध्यम)
|-
|करंगसेम विभाग
|अमलपुरा
|८३९.५४
|३,६०,४८६
|३,९६,४८७
|४,०८,४८७
|०.६४०(मध्यम)
|-
|क्लुंगकुंग विभाग
|सेमारापुरा
|३१५.००
|१,५५,२६२
|१,७०,५४३
|१,७५,५७३
|०.६८३(मध्यम)
|-
|तबनान विभाग
|तबनान
|८३९.३०
|३,७६,०३०
|४,२०,९१३
|४,३५,७५३
|०.७२६ (जास्त)
|-
|एकूण
|
|५७८०.०६
|३१,४६,९९९
|३८,९०,७५७
|४१,४८,५८८
|०.७२४ (जास्त)
|}
 
== अर्थव्यवस्था ==
 
१९७० च्या काळात बाली येथील अर्थव्यवस्था शेती प्रधान होती, पण आता पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय आहे आणि म्हणूनच बाली हे इंडोनेशिया मधील श्रीमंत क्षेत्र आहे.२००३ बाली ची ८०% अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून होती परंतु ही अर्थव्यवस्था २००२ आणि २००५ मध्ये इस्लामी दहशतवादी हल्ल्यामुळे कोलमडली.तेव्हा पासून आज पर्यंत यात बरीच सुधारणा झालेली आहे.
 
== शेती ==
पर्यटन व्यवसाय देशाच्या वार्षिक सकलन उत्पादनात महत्त्वाचे काम करतो पण तरीही शेती या बेटावरची रोजगाराची मुख्य साधन आहे.मासेमारी देखील येथे बघण्यात येते.येथील कारागीर जे विविध हस्तकला बनवितात या साठी देखील बाली प्रसिद्ध आहे,या हस्तकलेमध्ये बटिक आणि इकत हे कापड,लाकडवरील कोरीव काम,दगडावरील कोरीव काम,चित्रकला, चांदीची भांडी यांचा समावेश आहे.प्रत्येक गाव एक कला निवडतो आणि त्याच वस्तू बनवितो उदा.आवाज करणारे झुंबर किंवा लाकडी वस्तू ई.
 
१९६३ मध्ये बाली बीच नावाचे हॉटेल सनुर येथे सुकारपो द्वारे बांधण्यात आले आणि तेव्हा पासूनच येथील पर्यटन क्षेत्राला वाव मिळाला ,या आधी संपूर्ण बेटावर फक्त ३ हॉटेल होती. हळू हळू संपूर्ण बाली मध्ये हॉटेलच्या बांधकामाची कामे सुरू झाली. १९७० मध्ये गुराह राय आंतरराषट्रीय विमानतळ झाले आणि पर्यटक आणखीनच वाढलेत.बुलीलेंग सरकारने पर्यटनाला फार महत्त्व दिले. पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने बेटाच्या दक्षिणेला केंद्रित आहे.कुहा, लेगीअन, सेमिण्याक सानुर, उबुद, जम्बिरान, नुसा दुआ आणि पेकाटू हे मुख्य पर्यटन स्थळे इथे आहेत.२०१० मध्ये बालीला सर्वतकृष्ट बेट हा पुरस्कार ट्रॅव्हल ॲंड लिझर कडून मिळाला .हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. येथील मनमोहक दृष्ये,विविध देशातील पर्यटकांची हजेरी, उत्कृष्ट दर्जाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उपहारगृहे आणि स्थानिक लोकांची मित्रत्व वागणूक.बाली येथील संस्कृती आणि येथील धर्म हे देखील पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. केकक नृत्य हा येथील एक अतिशय प्रतिष्ठित कार्यक्रम जो देव आणि त्यांचे अनुयायी यांचे संबंध घट्टा करतो असे मानले जाते. बीबीसी अनुसार संटरिनी, [[ग्रीस]] नंतर बाली हे सर्वात उत्कृष्ट बेट आहे.
 
== वाहतूक ==
 
== लोक ==
 
==संस्कृती==
बाली हे त्याच्या आत्याधूनिक आणि वैविध्येने भरलेल्या संस्कृती साठी प्रसिद्ध आहे.येथील पाककृती देखील विशिष्ट आहे. इथे चित्रकला,शिल्पकला, लाकडावरील कोरीव काम, हस्तकला आणि कला प्रदर्शन हे सगळे प्रकार बघायला मिळतात . बाली येथील संगीत गमेलान या नावाने ओळखले जाते,हे संगीत फार विकसित आणि विविधतेने नटलेले आहे.
पेडेंट, लिगोंग, बासिस, टोपेंग,बरोंग,गोंग किबार आणि केकेक (माकडांचे नृत्य) या इथल्या प्रसिद्ध नृत्य पद्धती आहेत.
 
=== उत्सव ===
वर्षभरात या बेटावर विविध उत्सव साजरे केले जातात,हे उत्सव पारंपरिक कॅलेंडर अनुसार साजरे केले जातात .
हिंदू नववर्ष न्येपी हे वसंत ऋतू मधील एका दिवशी शांतता पाळून साजरे केले जाते.या दिवशी कोणीही घराबाहेर निघत नाही आणि पर्यटकांना सुद्धा आपल्या विश्राम खोलीतच राहायला सांगितले जाते.
 
== खेळ ==
 
== जागतिक वारसा स्थळ ==
 
== चित्रदालन ==
<br />
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले