महार जातीत १२ (साडेबारा) उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशीसोमस,लाडवन,बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, लाडवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. महारांत 'सोमवंशी' हे उच्चकुलीन समजले जातात, तर 'अक्करमाशी' हे कमी प्रतिचे समजले जातात. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये अस्पृश्यता त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही क्षेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणूकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि आज हा भेद जवळजवळ समाप्त झाला आहे.