६ पदरी असलेला मुंबई-पुणेमुंबई–पुणे द्रुतगती मार्गद्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत.
'''पूल पाडण्याचा निर्णय व वाद''' :
ओळ ९०:
'''पुलाचे पाडकाम''' :
मुंबई-पुणेमुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला.
अमृतांजन पुलाचे एकूण ४ गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला.