"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १५:
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नान्देड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केन्द्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास सन्तांची भूमी म्हटले जाते.
==इतिहास==
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे माण्डलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|title=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातन्त्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ|स्वामी रामानन्दतिर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेम्बर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेम्बर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई|मुम्बई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
|