"बिपिनचंद्र पाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
लाल-बाल-पाल त्रयीतील बंगालमधील सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्याच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे कि, बिपीन चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते. बिपिनचंद्राचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ रोजी पाईल (जि. सिलहेट- ढाका) या गावी झाला. त्याचे वडील रामचंद्रपाल हे पेशकार असून ते प्रखर देशभक्त व विशुद्ध चरित्राचे होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना वाटत होते. १८७९ मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नौकरीनोकरी केली.{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
बिपिनचंद्र पाल यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात पॉइल (जिल्हा सिल्हेट) या गावी झाला. सध्या हा प्रदेश बांगलादेशात अंतर्भूत होतो. बिपिनचंद्र यांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी विपूल वाचन केले. ब्राम्होसमाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी. के. रॉय, आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सुरुवातीस त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. नंतर त्यांनी 'वंदे मातरम्' हे दैनिक सुरू केले. बिपिनचंद्र हे एक् तत्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडित होती. ते होमरुल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते होते. बिपिनचंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. यातून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. याशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींचे चरित्रे लिहिली. पहाडी आवाजाचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल - बाल- पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्कराचे प्रचंड आंदोलन करुन जनजागृती केली. भारताच्य स्वातंत्र्य लढ्यातील ते एक चिरप्रेरक पर्व आहे. <ref>{{जर्नल स्रोत|date=२१ मे २०२०|title=व्यक्तिविशेष|journal=दैनिक पुढारी|pages=६}}</ref>{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|पाल, बिपिनचंद्र]]