"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
"ॲक्वापाॅनिक्स" शेतीची रचना जागेचे स्वरूप (जागेची रचना - जसे उताराची दिशा, वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता, इत्यादी), संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, झाडांचा (भाजीचा) प्रकार इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. "ॲक्वापाॅनिक्स"साठी साधारणतः खालील मुख्य घटक विचारात घेतले जातात -
 
* मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे – ही टाकी सिमेंट, प्लास्टिक किवा जमिनी मध्येजमिनीमध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवता येते. माशांची टाकी जमिनीच्या उताराच्या शेवटच्या टोकाला किवा उताराच्या वरच्या बाजूला असते. टाकीची लांबी रुंदी जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते पण ह्या टाकीची खोली दीड मीटरपेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणे खालपर्यंत न गेल्याने शेवाळ (पाणवनस्पती) किवा पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ नीट होत नाही, तसेच जास्त खोली पर्यंत पाण्यात हवा (ऑक्सिजन) मिसळण्याचा खर्च वाडते. टाकीला वरतून माशांचे पक्ष्यांपासून किवा इतर भक्षकांपासून संरक्षण करण्यासाठी जाळी असावी लागते.
* माशांच्या टाकीतील विष्ठा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्ठा टाकीतून काढून घेणे खूप महत्त्वाचे असते. ही विष्ठा टाकीतच राहिल्यास अमोनियाचे प्रमाण वाढत जाऊन माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच ही वि़ष्ठा टाकीत कुजताना (तिचे विघटन होताना) पाण्यातीलती विद्राव्यपाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्रमात्रा कमी होत राहते. विष्ठा पाण्यासोबत कडूनकाढून घेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असते. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास, अशी तोटी बसवणे शक्य नसते; अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) ही विष्ठा काढता येते.
* माशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी [[हवा]] मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य [[ऑक्सिजन]]चे प्रमाण खूप महत्त्वाचे असते. हे प्रमाण माशांच्या जातिनुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माशांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
* माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला काही वेळेला माशांच्या टाकीतून विष्ठा काढल्यानंतर ती हेते पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकीमध्ये घ्यावे लगते. असे केल्याने ह्या पाण्यातील उरलेला गाळ (विष्ठा) खाली बसते आणि नत्र स्थिरीकरणासाठी गाळ नसलेले (गाळ कमी झालेले) पाणी झाडांकडे घेऊन जाणे सोपे जाते.
* गाळ विरहित [[पाणी]] झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठीह्यासाठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माशांयांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केलेकरतात. जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपूनझिरपू- देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जातेठरवतात. उदाहरणार्थ NFTN.F.T. (Nutrient Film Technique) पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे माध्यमही महत्त्वाचे असते. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केला जात नाही, कारण मातीची पाणी धारणक्षमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजनचा) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "ॲक्वापाॅनिक्स"मध्ये विटांचे तुकडे, खडी, माती भाजून तयार केलेले गोळे, इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमांवर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे 'एरोबी' (aerobic - occurring only in the presence of oxygen) म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बॅक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्त्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जातेफिरवतात. हे पाणी नंतर परत माशांच्या टाकीत सोडतात. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जातेकरतात. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजनचा विनिमय ह्यावर नत्र रूपांतराचा वेग अवलंबून राहतो. हा वेग/दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्स" शेतीचे अर्थशास्त्र==