"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
[[File:Aquaponics1.jpg|thumb|Aquaponics1 in vigyan ashram]]
==ओळख==
"ॲक्वापाॅनिक्स" म्हणजे हायड्रोपाॅनिक्स (माती-रहित शेती) आणि [[मत्स्यशेती]] ह्याचे एकत्रीकरण. सोप्या शब्दात [[भाजीपाला]] आणि मासे ह्याचे एकत्रित संगोपन असेही म्हणता येईल. ॲक्वापाॅनिक्समध्ये झाडे आणि [[मासा|मासे]] ह्यांच्या एकमेकांना पूरक अश्या रचनेतून [[शाश्वत विकास|शाश्वत]] पद्धतीने शेती करणे शक्य होते. ही शेतीची संकल्पना तशी जुनी असून व्यावसायिक शेतीमध्ये ह्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये होत आले आहेत. "ॲक्वापाॅनिक्स"मध्ये अन्नद्रव्यांच्या नैसर्गिक ‘चक्राचा’ वापर करून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटक पुरवता येतात. तसेच पाण्याचाही ९०% पर्यंत पुनर्वापर केला जातो. त्यामुळे कमी जागेत आणि कमीतकमी संसाधनांचा उपयोग करून शेतीतून जास्त उत्पन्न आणि नफा मिळवता येतो. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये अ-नैसर्गिक किवा रासायनिक खतांचा वापर न-केल्याने ‘सेद्रिय’‘[[सेंद्रिय शेती|सेद्रिय’ शेती]] करणे सहज शक्य होते. ह्या पद्धतीचा उपयोग करून कमी जागा आणि कमीतकमी पाण्यामध्ये मस्य शेती करता येते. मस्य शेतीच्या रूपात शेतकरी जास्त प्रथिने उत्पादित करत असल्याने जास्त नफ्याची शेती असेही "ॲक्वापाॅनिक्स"ला म्हणता येईल. ज्या प्रदेशामध्ये पाऊसवर अवलंबून ‘एक पीक’ पद्धतीने शेती केली जाते, तेथे "ॲक्वापाॅनिक्स"चा उपयोग करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर, ‘शहरी शेती’मध्ये जेथे कमी जागेमध्ये किवा गच्चीवर पिके घेतली जातात तेथेही "ॲक्वापाॅनिक्स"चा चांगला उपयोग होऊ शकतो.
 
==ॲक्वापाॅनिक्सचे फायदे ==
#झाडांच्या आणि माशांच्या वाढीसाठी जास्त पोषक वातावरण मिळाल्याने कमी जागेत जास्त उत्पादन.
#[[पाणी]] आणि अन्नद्रव्याचा पुनर्वापर केल्याने कमी खर्च.
#वातावरण बदलाचा कमी परिणाम होत असल्याने वर्षभर उत्पादन.
#शाश्वत आणि सेद्रिय पद्धतीचा वापर केल्याने पर्यावरणपूरक शेती.
ओळ १३:
==ॲक्वापाॅनिक्सचे शास्त्र==
 
"ॲक्वापाॅनिक्स" ही मुख्य करून नत्र-चक्रावर आधारलेली संकल्पना आहे. कमी जागा आणि पाण्यामध्ये मस्यशेती करताना येणारी मुख्य अडचण म्हणजे पाण्यातील वाढत जाणारे नत्र (अमोनiया NH<small>3</small>/NH<small>4</small>)चे प्रमाण. माशांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात त्यामुळे मास्याशेतीमस्याशेती मध्ये माशांची वीष्टा आणि शिल्लक राहिलेले खाद्य ह्यामुळे पाण्यातील अमोनीया प्रमाण वाढत जाते. हा अमोनीया ०.५ ppm पेक्षा जास्त झाल्यास माशांची वाढ कमी होते तसेच माशांचा मृत्यू देखील होई शकतो. पण हे जास्त अमोनीया असलेले पाणी झाडांच्या मुळामधून (बक्टेरिया वाढू शकतील अश्या कोणत्याही घटकामधून) फिरवल्यास, ह्या पाण्यातील अमोनियाचे रुपांतर (Nitrosomonas-नायट्रोसोमोनस,Nitrobacter- नायट्रोबॅक्टर जातीतील बक्टेरियांच्या सहजीवनातून) सुरवातीला नायट्राईट (NO<small>2</small>) आणि पुढे नायट्रेट (NO<small>3</small>)मध्ये होते. नायट्रेट (NO<small>3</small>) हे झाडांसाठी उत्कृष्ट खत म्हणून काम करता असल्याने झाडे वापरतात. काही प्रमाणात नायट्रेट (NO<small>3</small>) शिल्लक जरी राहिले तरी हे आता माशांसाठी अमोनियाइतके घातक नसल्याने झाडांकडून परत जाणारे पाणी माशांसाठी शुद्धीकरण झाल्यासारखे असल्याने माशांची वाढ जोमाने होते. अमोनीया प्रमाणेच माशांच्या विष्टेतील इतरही अन्नघटक विविध जीवाणूंच्या मदतीने पुनर्वापराचे सहजीवन "ॲक्वापाॅनिक्स" स्थापले जाते. पाणी झाडांच्या मुळांशी सतत फिरवत राहिल्याने पाण्यातील विरघळलेल्या स्वरूपातील [[ऑक्सिजन]] (प्राणवायू) वाढत राहतो तसेच पाण्याचे ९० % पर्यंत पुनर्वापर करणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्सचे प्रकार==
ओळ २६:
*माशांच्या टाकीतील विष्टा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्टा टाकीतून काढू घेणे खूप महत्वाचे असते.हीहीविष्टा टाकीतच राहिल्यास अमोनीया चे प्रमाण वाढत जाऊन माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच ही विष्टा टाकीत कुजताना (तिचे विघटन होताना) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्टा पाण्यासोबत कडून खेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावी. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास, अशी तोटी बसवणे शक्य नसते अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) ही विष्टा काढता येऊ शकते.
 
*माशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी [[हवा]] मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य [[ऑक्सिजन]] प्रमाण खूप महत्वाचे असते. हे प्रमाण माशांच्या जाती नुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माशांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
 
*माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला माशांच्या टाकीतून विष्टा काढल्यानंतर ती हे पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकी मध्ये घेतले जाते. असे केल्याने ह्या पाण्यातील गाळ (विष्टा) खाली बसते आणि गाळ नसलेले (कमी झालेले) पाणी झाडांन कडे नत्र स्थिरीकरणासाठी घेउन्जाने सोपे जाते.
 
*गाळ विरहित [[पाणी]] झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माशांयांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे माध्यमही महत्वाचे असते. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केले जात नाही कारण मातीची पाणी धारण शमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "ॲक्वापाॅनिक्स" विटांचे तुकते, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माशांच्या टाकीत सोडतात. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजन चे विनिमन ह्यावर नत्र रूपांतराचा वेग अवलंबून राहतो. हा वेग/दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्स" शेती चे अर्थशास्त्र==