"बजाजी निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ आणि नोंदी: श्रीमानयोगी पुस्तक वाचून
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -
 
“विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले. गावी परतल्यावर आपल्याकडून झालेल्या धर्मांतराचा बजाजींना पश्चात्तपपश्चात्ताप झाला. बजाजीराव ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथे विधिसर हिंदू धर्मात आणले. त्यानंतर काही दिवसानीदिवसांनी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”
 
मात्र, असे धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय, हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात. , त्या हिशोबे त्यांचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिन्दूहिंदू म्हणूनच केला जातो.
 
== समकालीन पुरावे==-
१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, प्रथम त्याचा संदर्भ पाहूयापाहू या -
 
१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, प्रथम त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||
 
या मधे कवींन्द्रकवींद्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारतामध्ये येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे. तेव्हा शिवाजीवर फतहखानाचे संकट आले होते. कवींन्द्रकवींद्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कवींन्द्रकवींद्र परमानंद हे शिवाजीचे निकटवर्ती होते. तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.
 
२)निंबाळकर घराण्याची इ.स.१८२२मध्ये लिहिली गेलेली एक छोटी कैफियत बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली.तिच्यात असा एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी इ.स.१६५१मध्ये बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली. इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच असून, त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.
 
३) बजाजीराजे निंबाळकर अफजलखान स्वारीच्या वेळी सन १६५९मध्ये फलटण परिसरात होते.त्यांना अफजलखान याने पकडले व त्यांची सुंता करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली, त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थीने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेऊन अफजलखानाने त्यांना सोडले.
 
ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देतदिले आहोतआहे. -
 
” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले
 
साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे म्हसवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ”
( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )
 
जर इ. स . १६५९ मधे१६५९मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुंता करायची धमकी देतो. तर ह्यावरून सिद्ध होते की – १६५९च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुंता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.
 
पुराव्यासाठी रणजित देसाई शी संपर्क साधावा यांनी आपल्या श्रीमानयोगीश्रीमान योगी पुस्तकात बजाजी यांना मुसलमान केल्याचा उल्लेख केला आहे.
 
|| लेखन सीमा ||