"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ८४:
'[[सार्वजनिक सत्यधर्म]]' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून '<nowiki/>'''[[दीनबंधू]]'<nowiki/>''' हे साप्ताहिक चालविले जात असे. '''तुकारामाच्या अभंगांचा''' त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. '''आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला.''' ''''अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे'''. '''[[सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक|सार्वजनिक सत्यधर्म]] हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१''' मध्ये प्रकाशित झाला.
 
[[रा.ना. चव्हाण]] यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात [[सार्वजनिक सत्यधर्म]] या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाही चे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा लिहिली त्याच बरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या काळामध्ये वृत्तपत्र लिखाण देखील केले क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वांग्मय लिहिलेले आहे त्यांचा शेतकऱ्यांचा असूड गुलामगिरी या ग्रंथातून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठी चा मार्ग याचं समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केलेला आहे एकूणच त्यांच्या लिखाणाने तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून त्या समाजामध्ये शोषणा विरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता या लिखाणामधे होती
 
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना '''मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही [[उपाधी]]''' दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-