एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 8541854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्याच्या जोडीला महाराष्ट्रात अस्पृश्यतेची पद्धत स्त्री शिक्षणा वरील बंदी अशा विविध कारणांमुळे हिंदू समाजात दुरावस्था माजली अशा समाजाला दूर अवस्थेतून बाहेर काढण्याचा अनेक सुधारकांनी प्रयत्न केला महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या सामाजिक सुधारणेचा एक भाग म्हणजेच प्रार्थना समाजाची स्थापना होय अशा अनेक सभा आणि संघटना महाराष्ट्रमध्ये उभ्या राहिल्या आणि त्यातूनच सामाजिक सुधारणेला चालना मिळाली'''प्रार्थना समाज''' या संस्थेची स्थापना डॉ. [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग]], [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]] ]] या तर्खडकर बंधूंनी दिनांक [[३१ मार्च]], [[इ.स. १८६७]] रोजी [[मुंबई]]त केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. [[मुंबई]]तले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात [[वल्लभभाई पटेल]] रोड (जुने नाव सॅंडहर्स्ट रोड) आणि [[विठ्ठलभाई पटेल]] रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रार्थना समाजाला एकेश्वर उपासक मंडळी असंही म्हटले जात होते. परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्चित केली होती. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली या शाळेत सर्व जाती जमातीच्या मुलांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी वर्गात पोस्टमन, मोटर ड्रायव्हर, गिरणी कामगार, कारखान्यात काम करणारे कामगार, हमाल अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांना समावेश होता. विद्यार्थिवर्गासाठी 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू केली. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले. सन १८७८मध्ये पंढरपूर येथे अनाथआश्रमाची स्थापना केली. १८७६ ते ७७ या काळात दुष्काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी विविध जनउपयोगी कामे प्रार्थना समाजाने हाती घेतली. स्त्री शिक्षणाच्या उद्देश समोर ठेवून पुण्यामध्ये १८८८मध्ये महिलांसाठी शाळा प्रार्थना समाजाने सुरू केली. १८८२मध्ये पंडिता रमाबाई यांच्या आर्य महिला समाजाची सुरुवात ही प्रार्थना समाजाच्या आश्रयाने झाली.