"चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
'''चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष''' म्हणजे प्राचीन भारतातील [[पंजाब]] आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचा]] संस्थापक [[चंद्रगुप्त मौर्य]] आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये [[इ.स.पू. ३२५]] - [[इ.स.पू. ३२४|३२४]] च्या आसपास झालेला संघर्ष होता.
 
==पार्श्वभूमी== इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजा मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते हे साम्राज्य वायव्य भारतापासून रूम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते इसवी सन पूर्व 518 च्या सुमारास दारयुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते सम्राट च्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होते त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढली सम्राट दारयुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन अस्तित्वात आणले त्यामुळे व्यापार करणे सुलभ झाले परसेपोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारयूशच्या काळात बांधले गेले परसीपोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवीसनपूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिला येथे आला या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले त्यांनी सिकंदरा विरुद्ध बंड पुकारले सिकंदराला माघार घेणे भाग होते भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्र असे संबोधले त्यानंतरच तो परत माघारी फिरला परतत असताना वाटेत बॅबिलोन याठिकाणी इसवीसनपूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लिखाणातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैली चा उदय झाला ग्रीक राजांची आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे नाण्यावर त्या राज्याचे नाव असे सिकंदराची नाणीही अशाच प्रकारचे होते नंतरच्या काळात भारतातील राज यांनीही अशा प्रकारची नाणी रचनांमध्ये आणली
[[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडर]] भारतामध्ये होता त्यावेळेपासूनच त्याच्याविरोधातील असंतोष उफाळून आला होता. त्याचे सैन्य [[चिनाब नदी]] पार करत असताना निकानोर या त्याच्या क्षात्रपाचा अस्साकेनोई जमातीच्या लोकांनी वध केला होता. नंतर अलेक्झांडरने फिलिप या आपल्या विश्वासू सहकार्याची त्याच्याजागी सेनापती म्हणून नियुक्ती केली. फिलिपच्या अधिपत्याखाली वायव्य सीमेपासून [[खैबर खिंड|खैबर खिंडीपर्यंतचा]] [[गांधार|प्राचीन गांधारचा]] सर्व प्रदेश, निम्न काबूल खोरे आणि [[हिंदुकुश पर्वत|हिंदुकुश पर्वतापर्यंतचा]] सर्व प्रदेश होता. इ.स.पू. ३२५ मध्ये अलेक्झांडर भारतामधून परतला. त्यानंतर लवकरच फिलिपचाही वध करण्यात आला. अलेक्झांडर बॅबिलोनियाच्या मार्गावर असताना त्याला ही घटना कळली. फिलीपच्या जागी दुसरा सेनापती नियुकत करण्याणेवजी त्याने सर्व ग्रीक प्रदेश [[तक्षशिला]] येथील क्षात्रपाच्या हवाली केला. त्यामुळे भारतावरील ग्रीक नियंत्रण कमजोर झाले.