"कृषी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
'''कृषी साहित्य संमेलन''' या नावाने अनेक संस्था संमेलने भरवतात. त्या संस्थांमध्ये एकवाक्यता नसल्याने संमेलनांचे अनुक्रम लावणे शक्य नाही. प्रत्येक संस्था आपलेच संमेलन १ले आहे असा दावा करते.
 
* १ले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन [[नाशिक]] येथे नोव्हेंबर २०११ मध्ये होणार होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[विठ्ठल भिकाजी वाघ]] असणार होते. (
* १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष डॉ. [[विठ्ठल भिकाजी वाघ]] होते.
* एक कृषी साहित्य संमेलन कुंडलवाडी येथ २९ एप्रिल (सन?)ला झाले. संमेलनाध्यक्ष आमदार वामनराव चटप होते.
* २४ फेब्रुवारी २०१३ रोजी नाशिक येथे पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
* विखे पाटील प्रतिष्ठानसंचालित कृषी विकास परिषदेचे प्रस्तावित कृषी साहित्य संमेलन नाशिक,२४-२६ जानेवारी २०१४.
* महाराष्ट्र राज्य सरकारचा कृषी विभाग आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानचालित कृषी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथॆ २४-२६ जानेवारी २०१४ या काळात कृषी साहित्य संमेलन झाले. [[रा रं. बोराडे]] हे संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते..
* ३रे अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन २१-२२-२३ एप्रिल २०१५ या काळात औरंगाबादला भरले होते.
* पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च २०१६ झाले. या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडित होते. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतिदूत बुद्धविहार समिती माणुसदरी यांच्या संयुक्त पुढाकारने हे संमेलन झाले. त्यासाठी आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष मुंबईचे मोतीराम कटरे होते.