"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ६:
== गोविंदप्रभू चरित्रलीळा ==
{{बदल}}
ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून [[लीळाचरित्र]] हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही अवतरले आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यांमधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा जाणवल्याशिवाय राहत नाहीत {{संदर्भ हवा}}. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले {{संदर्भ हवा}}. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता {{संदर्भ हवा}}. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1/qXeZ72qKNigwQ | शीर्षकtitle = श्री गोविंद प्रभू | लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}{{मृत दुवा}}</ref>
 
==स्त्री आणि शूद्रादींचा उपासनेत सहभाग आणि प्रबोधन==
ओळ २४:
स्त्री आणि शूद्र या घटकाला समाजात त्याकाळी अजिबात स्थान नव्हते. मनुस्मृतीचा प्रचंड प्रभाव त्याकाळी होता त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला कुणीच हात घालत नव्हते. अज्ञानी असलेला समाज लाखो वर्ष या दडपशाहीच्या आणि बंधनाच्या ओझ्याखाली अडकला होता. भक्ती करण्याचा आधार केव्हाचाच काढून घेतला होता. इतकेच नव्हे तर अंत्यजांची सावली पडली म्हणजे पाप झाले अशी अंधश्रद्धा बोकाळात चालली होती. अशा परिस्थितीत गोविंदप्रभु मातंगाच्या घरी जाऊन उतरंडी उतरून त्यातील खाद्यपदार्थ खात. त्यांच्या मुलांचा सांभाळ करीत असे. कधी ते बालगोपालांशी खेळत,तेल्या तांबोळ्याच्या घरी जाऊन भाकरी खात असे, त्यामुळे स्त्री वर्ग, दलितांना व रंजल्या गांजलेल्याना ते आपलेसे वाटत. म्हणून सर्व समाजाने त्यांचा ‘राउळ माय राउळ बाप' म्हणून गौरव केला. गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा,कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. कधी सहज कुणाच्या मुखी शब्द यायचे " हे साचोकार ईश्वर होय: हे करणचरणवंत ब्रम्ह होय: जीवनमुक्त वस्तु ते ऐसी: " लगेच ते मिश्किलतेने उत्तर द्यायचे " ना हं मनुष्यो नच देवयक्षो न ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। न ब्रम्हचारी न गृहीवनस्थो: भिक्षुर्ण चाहं निज बोध रूप ;" वरील सर्व बाजूंचा विचार केला असता गोविंदप्रभु हेच महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात.
परंतु आज महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारांचे झेंडे लावणारे गोविंदप्रभुला विसरले की काय असा ठळक मुद्दा समोर येतो. त्यांच्या ओठी चुकूनही गोविंदप्रभुचे नाव येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. आपल्या मूळ प्रबोधनकाराला आपण विसरलो तर नाही ना हे समाज प्रबोधनकारांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्या रिद्धपूर भूमीत गोविंदप्रभूंनी आपलं उभं आयुष्य परिवर्तनासाठी घातलं त्या ठिकाणाची उपेक्षाच राहिली आहे
वरील सर्व बाबी लक्षात घेता, गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा = http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=vJdZwQfLlNRo8MtAtFnWvTe6WZQpD4RhQ0ncIfr1/qXeZ72qKNigwQ | शीर्षकtitle = श्री गोविंद प्रभू | लेखक = डॉ. यू.म. पठाण | दिनांक = २३ सप्टेंबर, इ.स. २००९ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ एप्रिल, इ.स. २०११}}{{मृत दुवा}}</ref>
 
==पुस्तके==