"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ १७:
'''मराठा साम्राज्य''' [[इ.स. १६७४]] ते [[इ.स. १८१८]] पर्यन्त [[भारत|भारतात]] अस्तित्त्वात असलेले [[हिंदू|हिन्दु]] राज्य होते. याच्या परमोच्च बिन्दूला या साम्राज्याने [[दक्षिण आशिया]]चा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[इ.स. १६४५]] मध्ये विजापूर राज्यातून [[पुणे|पुण्याजवळील]] [[तोरणा]] किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत [[औरंगजेब|औरंगजेबाविरूद्ध]] [[गनिमी कावा]] वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचण्ड वाढला. [[इ.स. १६८०]]मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर सम्भाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सन्ताजी आणि धनाजीसारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पन्तप्रधान असलेल्या [[पेशवे|(प्रथम बाजीराव नन्तर)पेशव्यांच्या]] हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसर्‍या लढाईत]] अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा [[दुसरा बाजीराव]] इंग्रजांबरोबर तिसर्‍या लढाईत पराभूत झाला व त्याने इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बीठूर येथे स्थायीक झाला(झाशी राणी काल)
 
गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बान्धणे व त्यायोगे आसपासच्या क्षेत्रावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व [[कान्होजी आंग्रे]] व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे साम्भाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व [[रॉयल नेव्ही|ब्रिटिश आरमारांना]] शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.<ref name="Setumadhavarao S. Pagadi. 1993 21">{{स्रोत पुस्तक| शीर्षकtitle= SHIVAJI|firstname= Setumadhavarao S| lastname=Pagadi|पृष्ठ=21|आयएसबीएन= 8123706472|प्रकाशक=NATIONAL BOOK TRUST|दुवा= http://books.google.com/books?id=UVFuAAAAMAAJ&pgis=1| लेखक= Setumadhavarao S. Pagadi.| वर्ष= 1993}}</ref>
 
== छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनकाल ==