हिंदू धर्मातील कल्पनेनुसार [[नारद मुनी]] हे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाच्या]] [[ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र|सात मानसपुत्रांपैकी]] एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने [[ब्रह्मर्षी]] पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे [[भगवान विष्णू]] यांच्या [[प्राचीन विष्णुभक्त|परमप्रिय भक्तांपैकी]] एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.
'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ [[पाणी]] असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददातीददाति सः नारदः') त्यांना [[स्वर्ग]]लोक,[[मृत्यू]]लोक व [[पाताळ]]लोक तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो.त्यांचे एका हाताता [[वीणा]] असते तर एका हातात [[चिपळ्या]]. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. [[कीर्तन]] याचेकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.<ref name="naarad>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2018-12-23#Asmpage_7 तरुण भारत, आसमंत पुरवणी, पान ७|शीर्षक= प्रतिकांच्या देशा - नारद|लेखक=डॉ.रमा गोळवलकर|दिनांक=२३-१२-२०१८ |प्रकाशक=[[तरुण भारत (नागपूर)|तरुण भारत वृत्तपत्र]], नरकेसरी प्रकाशन नागपूर. |ॲक्सेसदिनांक= २६-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
त्यांनीनारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर [[केयूर]] व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात [[खडावा]] असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतिचेप्रतीचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. त्यांना कळलाव्या असेही म्हणतात.<ref name="naarad></ref>
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.{{संदर्भ हवा}}पण या कळल लावण्यामध्ये सुद्धा जगाचे हित असते
संपूर्ण जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे भक्तिरसाचा सुगंध देणारे भक्तिमय गंगेमध्ये नाहुन जाणारे आणि इतरांना सुद्धा भक्ती मध्ये भक्ती रसामध्ये लावुन सोपा मार्ग दाखवणारे भक्ती काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद जे आपल्या शास्त्रांमध्ये रामायण महाभारत नवीन नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे प्रत्येक ग्रंथामध्ये दे वर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच भक्तिमार्गाला लावणारे मूळपुरुष नारदमुनीची म्हटले तरी काही हरकत नाही भक्तिमार्गाचा वीणा हाती घेऊन संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये सप्तपाताळा मध्ये भ्रमण करत असतात मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते तसा काही गरज नाही पण त्यांना त्यांचा स्वभाव स्वस्त बसू देत नाही बुडत हे जन न देखवे डोळा बरेच लोक देवाची नारद महा मुलींना कळ लावणारे म्हणतात पण साधुसंतांच्या कळल लावण्यामध्ये सुद्धा जगाचे हित असते
नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे आणि इतरांनासुद्धा भक्तीमध्ये,भक्तिरसामध्ये लावून सोपा मार्ग दाखवणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये दे वर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात.
==नारदांविषयीची मराठी पुस्तके==
* नारदपुराण (मूळ संस्कृत)
* नारद-लोकसंज्ञापक ब्रह्ममानसपुत्र : भक्तियोगाचे उद्गाते (नारदांच्या जीवनावर आधारित कादंबरी, लेखक - अनिल सहस्त्रबुद्धे)