[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पंडू|पंडूच्या]] दोन पत्नी होत्या. पंडू हीहा पंडुरोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते. त्यामुळे, पंडूबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषींनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली.