"नाटककार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ २८:
या नाटकांतील प्रत्येक प्रवेश बुद्धकालीन सामाजिक जीवनांचे एक एक दृश्य चित्रित करतो. त्यामुळें बौद्ध पर्वाचा इतिहास समजून घेण्यास प्रस्तुत नाटक बरेंच उपयोगी पडेल.
‘नाटक म्हणजे दृश्य काव्य.” या व्याखेच्या कसोटीवर प्रस्तुत नाटक कसून पाहण्याची आवश्यकता नाहीं. बोधिसत्वाच्या जीवनाची उपपत्ति लावण्यासाठीं धर्मांनंदानी निबंधाच्या ऐवजी नाटकाचा प्रकार अवलंबिला एवढेंच. तरीही नाटकाच्या तंत्रांत त्यांनी केलेली एक सुधारणा स्वीकारण्याजोगी आहे.
जुन्या रामलीलांमध्ये केव्हां केव्हां सूत्रधार सर्व वेळ रंगभूमीवर एका बाजूला उभा असे आणि नाटकाच्या पात्रांमध्यें आणि श्रोत्यांमध्ये दुभाष्याचें काम करी पण ख-याखु-या नाटकांमध्ये सूत्रधार नाटकाला प्रारंभ करून देऊन जो गुप्त होतो ते शेवटच्या भरतवाक्यापर्यंत प्रगट होत नाहीं. नाटकांतील मुख्य मुख्य दृश्यांमध्यें सांधा जुळविण्यासाठी नाटककारांना विष्कंभकाची युक्ति योजावी लागते. यांत जरी कवीचे चातुर्य प्रगट होत असलें आणि त्यामुळें आपण ‘तदानीन्तन’ आहोंत हा भास जरी कायम टिकत असला तरी खरोखर इतकी मेहनत घेण्याचे कारण नाहीं. एका प्रवेशावर किंवा अंकावर पडदा पडला म्हणजे सूत्रधारानें स्वत: पुढें येऊन पुढील कथानकाची तयारी करून देण्यास काहींच हरकत नाही.
|