"सत्यभामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Prasanna1990 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Prasanna1990 (चर्चा | योगदान) खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ११:
दुसऱ्या दिवशी तो मणी देवघरात ठेवला असता सत्राजितचा भाऊ प्रसेनजीत तो मणी परिधान करून जंगलात शिकारीसाठी गेला. तेथे एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला व प्रसेनजीतला ठार केले व तो मणी स्वतःकडे ठेवला. तो सिंह व त्याकडील मणी रूक्षराज जाम्बवंताच्या दृष्टीस पडतो. तेव्हा त्या सिंहास ठार मारून तो मणी त्याच्याकडून काढून घेतो, व आपली मुलगी जांबवंती हिला देतो.
इकडे सत्राजितला वाटले श्रीकृष्णाने आपल्या भावाची हत्या करून तो मणी चोरला असावा. व त्याने श्रीकृष्णावर चोरी व हत्येचा आरोप केला. तेव्हा श्रीकृष्ण आपल्यावरील आरोप खोटा ठरवण्यासाठी त्या मनीच्या शोधात जंगलात निघाला.
जंगलात गेल्यावर तो जांबवंताच्या गुहेजवळ गेला. मण्याचा प्रकाश पाहून तो आत गेला. तेव्हा त्याला त्या मण्यासाठी जाम्बवंताबरोबर युद्ध करावे लागले. जेव्हा जाम्बवंत युद्धात हरू लागला तेव्हा त्याने आपले प्रभू श्रीराम यांचे स्मरण केले. त्याची धाव ऐकून विष्णूचाच अवतार असलेल्या श्रीकृष्णाला आपल्या रामस्वरूपात यावे लागले. आपल्या देवाला पाहून जाम्बवंत त्याला शरण गेला व आपली चूक स्वीकारली व तो मणी श्रीकृष्णाला देऊ केला व त्याला आपली मुलगी जाम्बवंती हिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. अशाप्रकारे श्रीकृष्ण व जांबवंती हीचा विवाह झाला.
नंतर तो मणी घेऊन श्रीकृष्ण सत्राजितकडे गेला.
|