"नाटककार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ २३:
नेहमीच्या व्यवहारांत जे चुकीचे आदर्श बाळगले जातात आणि राष्ट्रांराष्ट्रांच्या व्यवहारांत जी नैतिक शिथिलता आढळून येते त्याचा उपाय बुद्धाला सांपडला आणि तो त्यानें लोकांना जन्मभर उपदेशिला. पारलौकिक इतिहास-भूगोलाच्या कल्पना लोक पुराणांतून वाचतात. स्वत:च्या चुकांचें खापर दैवाच्या अथवा दैवी व्यक्तींच्या माथीं फोडतात आणि भोगविलासांनी क्षीण झाल्यानंतर दुस-या टोकाला जाऊन देहदंडन करणे हाच उपाय आहे असें मानतात, आणि ज्याप्रमाणें इहलोकीं राज्यकर्त्यांना लांच देऊन कायद्याला धाब्यावर बसवितां येते त्याचप्रमाणें देवदेवींना यज्ञयागादिकाची लांच देऊन कर्माच्या आणि कर्मफलाच्या सार्वभौम सिद्धांताच्या कचाटयांतून सुटून जाण्याची आशा बाळगतात.
या सर्व गोष्टींचें वैयर्थ्य सिद्धार्थाला पटलें आणि त्यानें मनुष्य जातीला या भ्रम–जालांतून सोडविण्याचा प्रयत्न केला.
या दृष्टीनें पाहतां धर्मानंदांनी येथे मांडलेली उत्पत्ति अधिक सयुक्तिक वाटते. आणि म्हणावेसें वाटतें कीं गौतमाच्या वैराग्याला कारण कांहींही झालेलें असो, प्रस्तुत नाटकांत दिलेल्या उपपत्तिनंतरच बुद्धाचा उपदेश आपल्याला आधिक चांगल्या रीतीनें पटतो. जुनें बुद्धचरित्र देखील खरोखर एक अनैतिहासिक रसिक नाटकच आहे !
प्रस्तुत नाटकांत धर्मानंदांनीं सत्याग्रह शब्द आणल्यामुळें गांधीयुगाची छाया त्याच्यावर पडलीशी दिसते. पण “सत्याग्रह” हें नांव जरी नवें असलें तरी सत्याग्रह ही वस्तु माणुसकीच्या प्रेम-धर्माला किंवा हृद्य-धर्माला अपरिचित नाहीं.
|