"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६८:
== अमृतांजन पूल ==
दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय.
'''पुलाचा इतिहास:'''
मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणी प्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकीर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पूलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला.
'''पुलाचे पाडकाम:'''
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीस अमृतांजन पूलाचा अडथळा होत असल्यामुळे पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरु होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्कयान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्वाया वाहन संख्येचा फायदा घेत ऐतिहासिक महत्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला.
अमृतांजन पुलाचे एकूण ४ खांब पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी 1 मीटर अंतरावर आणि 2 मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला.
==बाह्य दुवे==
|