"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1393943 by सांगकाम्या on 2016-05-18T02:59:36Z |
||
ओळ २७:
'''विनायक पांडुरंग करमरकर''', ऊर्फ '''नानासाहेब करमरकर''', ([[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८९१]]; सासवणे, [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[जून १३]], [[इ.स. १९६७]]) हे [[मराठी]] शिल्पकार होते. [[मुंबई]]च्या [[सर जे.जे. कला विद्यालय|सर जे.जे. कला विद्यालयात]] ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले.
==कार्य==
भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा
==जीवन==
ओळ ३३:
==व्यावसायिक कारकीर्द==
[[मुंबई]]च्या [[जे. जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी [[कोलकाता| कलकत्ता]] इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी [[रवींद्रनाथ टागोर]], [[चित्तरंजनदास]], [[महात्मा गांधी]], [[पी.सी. रे]] प्रभृतींची [[व्यक्तिशिल्प|व्यक्तिशिल्पे]] घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अॅकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना [[इटली]], [[फ्रान्स]], [[स्वित्झरलंड]] या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच
===व्यावसायिक यश===
इ.स. १९२४ साली कलकत्यातील ईडन गार्डनमध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट्स'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात करमरकरांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला. याच काळात [[पुणे|पुण्यातील]] 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल' मधील शिवाजीचा अश्र्वारूढ एकसंध 'पुतळा' [[ब्रॉन्झ]]मध्ये बनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या [[ओतकाम|ओतकामाचे]] कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झाले. आपले सगळे तांत्रिक कौशल्य, अध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करून त्यांनी ही शिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्याची स्थापना झाली. पुतळा पुण्याला आणताना कमी उंचीचा बोगदा आला की आगगाडी थांबवून पुतळा थोडा तिरपा करत आणि गाडीने बोगदा पार केला की परत सरळ करीत. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.
|