"कमलाबाई देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) भर घातली |
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) संदर्भ जोडणे |
||
ओळ १०:
==साहित्य लेखन व पुस्तके==
कमलाबाईंनी कथा, कविता, शब्दचित्रे असे विविध लेखन केले आहे. सतीबंदी कायद्यापासून ते हिंदू कोड बिलापर्यंत स्त्रियांसाठी असणार्या कायद्यांचा अभ्यास करून ‘स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला १९६१ चा न. चिं. केळकर वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘स्मरणसाखळी’ ह्या कमलाबाईंच्या आत्मचरित्रात त्या काळातील विधवा स्त्रियांच्या स्थितीचे प्रातिनिधिक चित्रण आहे. १९४३ मध्ये ते प्रकाशित झाले. स्त्रीगीतांचे संशोधन करून त्यांनी ‘अपौरुषेय वाङ्मय अर्थात स्त्रीगीते’ हे पुस्तक लिहिले. अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, महाराष्ट्रातील संतस्त्रिया याविषयी त्यांनी विपुल लेखन केले, व्याख्याने दिली. पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यानमालेतही त्यांचा सहभाग असे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी ‘भारत सेविका समाजा’ची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. महर्षी अण्णासाहेब कर्वे ह्यांच्या प्रेरणेतून त्यांचे कार्य उभेे राहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://https/%3a%2f%2fwww.bytesofindia.com%2fnewsdetails%3fNewsId%3d5358545671407543829|शीर्षक=कमलाबाई देशपांडे|संकेतस्थळ=https|अॅक्सेसदिनांक=2020-03-31}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://epustakalay.com/marathi/book/4812-hansaraa-nirmaalya-by-kamalabai-deshpande/|शीर्षक=हंसरा - निर्माल्य {{!}} Hansaraa Nirmaalya - Marathi PDF Download {{!}} Read Online {{!}}|संकेतस्थळ=Marathi Books - Epustakalay|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-03-31}}</ref>
<br />
|