"महाराष्ट्र टाइम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४१:
}}
 
'''महाराष्ट्र टाइम्स''' हे मुंबईतून प्रसिद्ध होणारे मराठी दैनिक आहे. ते 'टाइम्स ऑफ इंडिया' (बेनेट, कोलमन अँडॲंड कंपनी लिमिटेड) गटाच्या मालकीचे वृत्तपत्र आहे. द्वा.भ.कर्णिक, गोविंद तळवलकर, कुमार केतकर, भरतकुमार राऊत, अशोक पानवलकर असे नामवंत पत्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक पदी होते. श्री. पराग करंदीकर हे विद्यमान संपादक आहेत. प्रत्येक आवृत्तीस संपादक आणि प्रकाशक वेगवेगळे आहेत.
 
==स्थापना==
'महाराष्ट्र टाइम्स'ची स्थापना महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार झाली.'महाराष्ट्र टाइम्स' सुरु करण्यामागील प्रेरणा श्री. यशवंतराव चव्हाण यांचीच असल्याचे बेनेट, कोलमन अँडॲंड कंपनी लिमिटेड कंपनीचे तत्कालिन अध्यक्ष शांतीप्रसाद जैन यांनी जाहीरपणे सांगितले होते.<ref>[[रा. के. लेले]], मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-</ref>पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभात श्री.शांतीप्रसाद जैन यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.<ref>रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२६,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-</ref>यावेळी श्री. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,"टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे." ही माहिती 'महाराष्ट्र टाइम्स'च्या १९ जून १९६२ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली.<ref>रा. के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : महायुद्ध आणि स्वातंत्र्य व नंतर, पान १०२५,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-</ref>
 
==पहिला अंक==