"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ११:
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|इवलेसे|उजवे|[[इ.स. १९३७]] साली [[महात्मा गांधी]] सोबत [[पंडित जवाहरलाल नेहरू]]]]
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मीर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे ग्रामीण भागांत सुरू होत असलेला [[नक्षलवाद]] यांमुळे [[भारतातील आतंकवाद]]ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून [[१९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९४७]], [[१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध|१९६५]], [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१]] व [[कारगील युदध|१९९९]] मध्ये युद्धे झाली. भारत [[अलिप्त राष्ट्रगट चळवळ]]ीचा तसेच [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघाचा]] संस्थापक सदस्य आहे. इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून
== प्राचीन सिंधू संस्कृती ==
ओळ ८२:
[[चित्र:Demetrius I of Bactria.jpg|डावे|इवलेसे|120px|भारतीय-ग्रीक राज्यकर्ता डेमेट्रीयस पहिला इस पूर्व २०५ ते १७१]]
अलेक्झांडरच्या म्रुत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड मौर्य साम्राज्य काळातच ढिली पडली. परंतु भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया (इराण) व [[बॅक्ट्रीया]] (अफगणिस्तान) मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अश्या प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला वायव्य प्रांत सांस्कृतीक दृष्ट्या वेगळा बनू लागला. डेमेट्रीयस या ग्रीक राजाने इसपूर्व १८० मध्ये भारतीय-ग्रीक राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार अफगणिस्तान, पाकिस्तान, पंजाब प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये २ शतकापर्यंत टिकली. या काळात ३० पेक्षा अधीक ग्रीक राज्यकर्तांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच भारतीय राज्यकर्त्यांशी लढत. मिलिंद अथवा [[
=== भारतीयांचा पाश्चिमात्य जगाशी व्यापार ===
ओळ १२६:
[[चित्र:Taj Mahal (south view, 2006).jpg|इवलेसे|[[ताजमहाल]],मुघल स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण]]
{{main|मुघल साम्राज्य}}
{{हे सुद्धा पहा|बाबर|हूमायूं|अकबर|जहांगीर|
इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत [[बाबर]] जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.<ref>[http://www.ucalgary.ca/applied_history/tutor/islam/empires/mughals/ The Islamic World to 1600: Rise of the Great Islamic Empires (The Mughal Empire)]</ref> मुघल साम्राज्याने १७ व्या शतकात भारताच्या बहुतेक भागावर राज्य केले व १७०७ नंतर औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर या साम्राज्याची घसरण चालू झाली सरतेशेवटी १८५७ पर्यंत एका लहान संस्थानिकाचा आकारा पर्यंत मर्यादित राहून टिकली. १८५७ मध्ये ब्रिटीशांनी मुघल राज्य खालसा करून टाकले. या काळात उत्तर भारतात मोगलांचे व दक्षिण भारतात विविध शाहींची राज्ये होती. १६८८ पर्यंत मोघलांच्या राज्याचा विस्तार प्राचीन मौर्य साम्राज्याच्या विस्ताराऐवढा होता. दिल्ली सल्तनतींच्या तुलनेत मुघल साम्राज्याने धार्मिक सलोखा ठेवला. यात [[सम्राट अकबर]]ने पुढाकार घेतला होता. त्याने स्वता:ही दिन-ए-इलाही हा धर्मही चालू केला होता. तसेच हिंदूंवर लादला जाणारा झिजीया करही माफ करून टाकला होता. मोगलांनी भारतीय स्थापत्यामध्ये परिवर्तन आणले व आजच्या भारतीय स्थापत्याची ओळख प्रामुख्याने मुघली स्थापत्यावरुन होते. जगप्रसिद्ध ताजमहाल मोघल सम्राट
== मराठा साम्राज्य ==
ओळ १४८:
ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु होते तर पहिले राष्ट्रपती [[राजेंद्र प्रसाद]] हे होते. १९५२ मध्ये पहिल्या सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. तेव्हा भारत सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र झाले. १९५५ ते १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेचा आग्रह भारताच्या बहुतेक सर्व भागातून होऊ लागला. आंदोलने व जनाग्रहास्तवामुळे भारताची भाषावार प्रांतरचना झाली. पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली भारताने साम्यवादाशी मिळतीजुळती अर्थव्यवस्था स्वीकारली. पंचवार्षिक योजनांनी नियोजन करून भारताने स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये धरणे, रस्ते व लोह पोलादांचे उद्योग यांना प्रोत्साहन दिले. [[हरितक्रांती]]वर जोर देऊन भारताचे अन्न धान्याबाबतीत परावलंबन कमी करण्याचा प्रयत्न केला. [[१९६२ चे भारत-चीन युद्ध|१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण]] केले. या युद्धाचा धडा घेउन भारताने यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. यानंतर १९६५मध्ये पाकिस्तानने [[१९६५चे युद्ध|आक्रमण]] केल्यावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. बांगलादेशातील घडामोडींमुळे १९७१मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून स्वंतत्र [[बांगलादेश]]ची निर्मिती केली.
१९६६ नंतरची १८ वर्षे भारतीय राजकारणावर [[इंदिरा गांधी]]ंचे वर्चस्व राहिले. १९७५-७६ मध्ये इंदिरा गांधींनी देशावर दीर्घकाळ आणीबाणी लागू केली त्यामुळे संतप्त जनतेने पुढील निवडणुकीत
भारताला सवतॠ हिटलरमुळे मिळाल॓.
इंदिरा गांधींनंतर [[राजीव गांधी]]ंनी सहानभूतीपोटी निवडणूकीत अभूतपूर्व यश मिळवले, स्थिर सत्तेच्या जोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. [[श्रीलंका]] व [[मालदीव]] मधील हस्तक्षेपामुळे १९९१ मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधींची हत्या केली. १९८९ पर्यंत पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आला परंतु काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवादी चळवळ सक्रीय झाली व ९० च्या दकशकात मुख्यत्वे ग्रासले. १९९२ मध्ये हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्षांनी रामजन्मभूमीचा शतकानुशतके चाललेला विवादाला तोंड फोडले व त्याची परिणीती [[बाबरी मशीद]]ीच्या विध्वंसात झाली.
|