"गजानन दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४५:
त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत ''पुढचं पाऊल'' (पटकथा, संवाद, गीते १९५०), ''बाळा जो जो रे'' (१९५१), ''लाखाची गोष्ट'' (१९५२), ''पेडगावचे शहाणे'' (१९५२), ''ऊन पाऊस'' (१९५४), ''मी तुळस तुझ्या अंगणी'' (१९५५), ''जगाच्या पाठीवर'' (१९६०), ''संथ वाहते कृष्णामाई'' (१९६७) ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही).
 
''तूफान और दिया'' (१९५६), ''दो आँखेऑंखे बारह हाथ'' (१९५७), ''गूँजगूॅंज उठी शहनाई'' (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट.
 
माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. ''पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री'' (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत.