"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎फडके यांची चरित्रे: संदर्भ जोडला.
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
५ मार्च १८७९ रोजी [[जेजुरी]]<nowiki/>जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले..<br/>
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके [[अक्कलकोट]] [[स्वामी समर्थ|स्वामी समर्थां]]<nowiki/>कडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही.'' असे सांगून त्यांना निराश केले<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref>
Djdjd
 
फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. [[मांग|मातंग]], [[रामोशी]], [[धनगर]], [[कोळी (जात)|कोळी]] आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरुर]] आणि [[खेड]] तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.