"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०:
}}
'''ऊर्मिला पवार''' (जन्म: ७ मे १९४५) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. पवार यांचे वडील शिक्षक होते. पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरितार्थ चालवावा लागला. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार करतात.
Line ४४ ⟶ ४३:
ऊर्मिला पवार पुढे [[महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम खाते|महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात]] नोकरीला लागल्या.(संदर्भ?)
==लिहिलेली पुस्तके==
Line ५५ ⟶ ५४:
## आयदान (इंग्रजी भाषांतर, कोलंबिया विश्वविद्यालय) २००९, कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयॉर्क
# उदान (पाली भाषेतल्या ’तिपिटक सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथाचा अनुवाद) बौद्ध तत्त्वज्ञानपर कथा १९८९, सुगावा प्रकाशन, ८६१ सदाशिव पेठ पुणे
# चौथी भिंत (कथासंग्रह) १९८९, संबोधी प्रकाशन, गोरेगाव(पूर्व) मुंबई
# दोन एकांकिंका - एलास पावन्यात बसा बसा व मुक्ती - १९९६, समता प्रकाशन, मुंबई
# मॉरिशस - एक प्रवास (प्रवासवर्णन) १९९४, सुगंधा प्रकाशन, मुंबई
Line ६८ ⟶ ६७:
* ’आयदान’ला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेला ’लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ ऊर्मिला पवार यांनी नाकारला. कारण सांगताना ’वर्णवादाला मसापचा नकार नाहीये. अशा संस्थेकडून पुरस्कार घेणं योग्य नाही,(''स्वल्पविराम मुळातलाच!'') असं वाटलं, म्हणून मी मसापचा पुरस्कार नाकारलाय’.... ’मसापच्या सरस्वतीपूजन आणि पसायदानाला माझा विरोध आहे.’ (आधार :’महानगर’च्या मध्ये १२ जून २००४च्या अंकात प्रसिद्ध झालेली, ऊर्मिला पवार यांची प्र.म. लता यांनी घेतलेली मुलाखत).
* जुलै २००४मध्ये मिळालेला ’प्रियदर्शनी अकादमी’चा २५००० रुपयांचा पुरस्कार.
* धुळे येथे झालेल्या ११व्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन
* नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सटाणा येथे कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत ऊर्मिला पवार यांना समाज प्रबोधन संस्थेचा राज्यस्तरीय 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
|