"एस्थर डुफ्लो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १७:
जगातील गरीब लोक कसे पिचले जातात, देशांचे आर्थिक धोरण त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी कसे साहाय्यक ठरू शकते या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डुफ्लो यांनी सुमारे वीस वर्षे खर्च केली. गरीबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व आर्थिक धोरणे कशी कारणीभूत होतात, हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे.
शिवाय आरोग्य, शिक्षण, विकास या गोष्टी दारिद्र्य निर्मुलनाच्या बाबतीत मोलाची भूमिका बजावत असतात, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिध्द केले. केनियातील एच. आय. व्ही. प्रतिबंध, शिक्षकांना दिलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांना कसे साहाय्यभूत ठरते हे त्यांनी आभ्यासले. भारतातील आरोग्य, [[विमा]] व सूक्ष्मवित्त लस्सीकरणाचा वाढता दर व त्याचे परिणाम यांबाबत विस्तृत लेखन केले. त्यांनी अभ्यासलेल्या देशांमधील लोकांमध्ये एक समान धागा आढळतो. तो म्हणजे सद्यपरिस्थितीतील त्यांचा आवेगपूर्णपणामुळे ते भविष्यात अधिक विवेकी वर्तन करतील.
डुफ्लो यांनी आपले सहकारी अभिजित व क्रेमर यांच्या सहकाकार्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी यादृच्छित (सर्वसाधारण) नियंत्रित चाचणी (रँडमाईज्ड कंटोल ट्रायल – आरसीटी) ही पद्धत विकसित केली. सदरची पद्धत मोठ्या प्रमाणावर औषध निर्मिती क्षेत्रात नवीन औषधांची चाचणी करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे औषधांच्या स्विकृतीसंबंधी जसे निर्णय घेणे शक्य होते, तसे एखाद्या धोरणाची पडताळणी करून गरिबी हटविण्यासाठी ते कितपत यशस्वी ठरू शकेल हे ठरविता येते. भारतातील विकासाच्या अनेक धोरणांना त्या वेडसरपणा (खूळ) असे संबोधतात.
|