"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''मीरा यशवंत आंबेडकर''' (जन्म : नीरा विठ्ठल साळवे; ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक, राजकीय व [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरवादी चळवळीतील]] कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सून व [[यशवंत आंबेडकर]] यांच्या पत्नी आहेत. [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/akola/history-dhammachakra-pravartan-din-celebrations-akola-district/|title=अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास|date=9 ऑक्टो, 2019|website=Lokmat}}</ref> तसेच रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आनंदराज]] यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा [[आनंद तेलतुंबडे]] यांच्याशी विवाह झाला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर मीरा यांनी [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहेत.<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/india/india-others/battle-to-head-ambedkars-society-nears-end-in-hc-2/|title=Battle to head Ambedkar’s Society nears end in HC|date=16 एप्रि, 2014}}</ref>
 
मीरा आंबेडकर यांचा जन्म रावडूळ ता. [[महाड तालुका|महाड]] जि. [[रायगड जिल्हा|रायगड]] ([[कुलाबा]]) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल साळवे, तर आईचे नाव कमळाबाई होते. मीरा यांचे माहेरकडचे नाव 'नीरा' असे होते.<ref>{{Cite book|title=Suryaputra Yashwantrao Ambedkar|last=Khobragade|first=Fulchand|publisher=Sanket Prakashan|year=2014|isbn=|location=Nagpur|pages=12|language=Marathi}}</ref> परिवारात नीरा (मीरा), सिंधू, निर्मला, ऊर्मिला व विमल ह्या पाच मुली तर पांडुरंग हा एकुलता मुलगा होता.<ref>{{Cite book|title=Suryaputra Yashwantrao Ambedkar|last=Khobragade|first=Fulchand|publisher=Sanket Prakashan|year=2014|isbn=|location=Nagpur|pages=12, 13|language=Marathi}}</ref> त्यावेळी नीरा [[गुजरात]] मधील मेहसाणा येथे राहात होत्या. वडील रेल्वेत नोकरीला होते. आई, वडील व नीरा मुंबईला सुशिला जाधव या त्यांच्या चुलत बहिणीकडे आले असताना यशवंत आंबेडकरांनी त्यांना पाहिले. यशवंतरावांनी अधिक माहिती काढून त्यांच्या कुटुंबापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्न जुळवणीत [[चांगदेव खैरमोडे]] यांच्या पत्नी [[द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे|द्वारकाबाईंचा]] विशेष सहभाग होता. मीरा व यशवंत यांचा [[लग्न|विवाह]] १९ एप्रिल १९५३ रोजी परळ येथील आर.एम. भट हायस्कूलच्या हॉलमध्ये [[बौद्ध धर्म|बौद्ध पद्धतीने]] झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[नवबौद्ध चळवळ|धम्मदीक्षा]] घेतलेली नव्हती. या लग्नास बाबासाहेब हजर नव्हते, मात्र [[सविता आंबेडकर]] उपस्थित होत्या.<ref>{{Cite book|title=Suryaputra Yashwantrao Ambedkar|last=Khobragade|first=Fulchand|publisher=Sanket Prakashan|year=2014|isbn=|location=Nagpur|pages=13|language=Marathi}}</ref>