"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) साचा काढला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''मीरा यशवंत आंबेडकर''' (जन्म: नीरा विठ्ठल साळवे; ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सुन व [[यशवंत आंबेडकर]] यांच्या पत्नी आहेत. [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] तसेच रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आनंदराज]] यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा [[आनंद तेलतुंबडे]] यांचेशी विवाह झालेला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर मीरा यांनी [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहेत.
मीरा आंबेडकर यांचा जन्म रावडूळ ता. महाड जि. रायगड जिल्ह (कुलाबा) येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव विठ्ठल साळवे, तर आईचे नाव कमळाबाई होते. मीरा यांचे माहेरकडचे नाव 'नीरा' असे होते.<ref>{{Cite book|title=Suryaputra Yashwantrao Ambedkar|last=Khobragade|first=Fulchand|publisher=Sanket Prakashan|year=2014|isbn=|location=Nagpur|pages=12|language=Marathi}}</ref> परिवारात नीरा (मीरा), सिंधू, निर्मला, ऊर्मिला व विमल ह्या पाच मुली तर पांडुरंग हा एकुलता मुलगा होता.<ref>{{Cite book|title=Suryaputra Yashwantrao Ambedkar|last=Khobragade|first=Fulchand|publisher=Sanket Prakashan|year=2014|isbn=|location=Nagpur|pages=12, 13|language=Marathi}}</ref> त्यावेळी नीरा गुजरात मधील मेहसाणा येथे राहात होत्याय वडील रेल्वेत नोकरीला होते. आई, वडील व नीरा मुंबईला सुशिला जाधव या त्यांच्या चुलत बहिणीकडे आले असताना यशवंत आंबेडकरांनी त्यांना पाहिले. यशवंतरावांनी अधिक माहिती काढून त्यांच्या कुटुंबापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यात [[चांगदेव खैरमोडे]] यांच्या पत्नीचा विशेष सहभाग होता. मीरा व यशवंत यांचा विवाह १९ एप्रिल १९५३ रोजी परळ येथील आर.एम. भट हायस्कूलच्या हॉल मध्ये [[बौद्ध धर्म|बौद्ध पद्धतीने]] झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली नव्हती. या लग्नास बाबासाहेब हजर नव्हते, मात्र [[सविता आंबेडकर]] उपस्थित होत्या.<ref>{{Cite book|title=Suryaputra Yashwantrao Ambedkar|last=Khobragade|first=Fulchand|publisher=Sanket Prakashan|year=2014|isbn=|location=Nagpur|pages=13|language=Marathi}}</ref>
|