"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५०:
</poem>
 
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. '''१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळाbcशाळा''' काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच '''अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन''' केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. सामाजिक प्रबोधनाची व परिवर्तनाची चळवळ पुढे नेताना महात्मा फुल्यांनी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं माध्यम ठरवलं कारण शिक्षणामुळेच एक नवी दृष्टी ही समाजाला देता येईल आणि समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा व सामाजिक भेद दूर करता येईल अंधश्रद्धेमध्ये अडकलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल व एक मूल्य धारा व वैचारिकता लोकांमध्ये परिवर्तित झाल्याशिवाय समाज प्रबोधन व सामाजिक परिवर्तन खऱ्या अर्थाने घडून येणार नाही याची जाणीव महात्मा फुल्यांना होती म्हणूनच हंटर कमिशनला साक्ष देताना त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादित केली ते खऱ्या अर्थाने सेंद्रिय बुद्धीमंत होते याचं स्पष्टीकरण इटलीतील मार्क्सवादी तत्ववेता व महात्मा फुले यांचे समकालीन असलेल्या ग्रामची यांनी त्यांना सेंद्रिय बुद्धीमंत असं म्हटलेलं आहे {{संदर्भ हवा}}
 
 
== सामाजिक कार्य ==