आदिवासी समाज हा मुळ भारतीय समाज आहे.एकेकाळी डोंगराळभारतीय प्रदेशातवनसंपत्तीचा आणिमालक रानावनातअसणारा रहातहा आलेल्यासमाज लोकांनाइंग्रजांच्या मुळआर्थिक भारतीयांनाशोषणामुळे आदिवासीआर्थिकदृष्ट्या म्हणतात.दुर्बल बनत गेला.आदिवासी साधारणपणेम्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय.आदिवासी सरळसमाज आणिहा भोळेभाबडेनिसर्गपूजक असतातआहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लॊकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ. स. १९६२ साली शिलाँगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे- "एका समान भाषेचा वापर करणा-या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणा-या, तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणा-या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज' म्हणताता. <ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय आदिवासी|last=नाडगोंडे|first=गुरुनाथ|publisher=कॉन्टिनेन्टल प्रकाशन|year=१९८६|location=पुणे|pages=३}}</ref>