"गुलझारीलाल नंदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३७:
| तळटीपा =
}}
गुलझारीलाल नंदा (४ जुलै १८९८ - - १५ जानेवारी १९९८) एक भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते जे कामगार प्रश्नांमध्ये तज्ञ होते. १९६४ मध्ये [[जवाहरलाल नेहरू]] आणि १९६६ मध्ये [[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानंतर दोन अल्प कालावधीसाठी ते भारताचे कार्यवाहक पंतप्रधान होते. सत्ताधारी[[ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]]च्या संसदीय पक्षाने नवीन पंतप्रधान निवडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुदती संपुष्टात आल्या. १९९७ मध्ये त्यांना [[भारतरत्न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/news/1998/jan/15nan.htm |title=Rediff On The NeT: Former PM Gulzarilal Nanda dead |publisher=Rediff.com |date= |accessdate=2015-05-25}}</ref><ref>{{cite book|author=Disha Experts |title=General Awareness for SSC Exams - CGL/ CHSL/ MTS/ GD Constable/ Stenographer |url=https://books.google.com/books?id=NrctDwAAQBAJ&pg=SL2-PA90 |date=10 July 2017 |publisher=Disha Publications |isbn=978-93-86323-29-3 |pages=2–}}</ref>
 
== पूर्वीचे जीवन ==
ओळ ४७:
 
== राजकीय कारकीर्द ==
१९३७ मध्ये नंदा मुंबई विधानसभेवर निवडून गेले आणि १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी मुंबई सरकारचे संसदीय सचिव (कामगार व उत्पादन शुल्क) या पदावर काम केले. १९४६-५० दरम्यान त्यांनी मुंबई सरकारचे कामगार मंत्री म्हणून काम पाहिले. राज्य विधानसभेत कामगार विवाद विधेयक यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी कस्तुरबा मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांनी हिंदुस्तान मजदूर सेवक संघ (भारतीय कामगार कल्याण संघटना) चे सचिव आणि बॉम्बे हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते राष्ट्रीय नियोजन समितीचे सदस्य होते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेसचेकाँग्रेसचे आयोजन करण्यात त्यांचे मुख्य योगदान होते, आणि नंतर ते अध्यक्ष झाले.
 
मार्च १९५० मध्ये नंदा भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. सप्टेंबर १९५१ मध्ये त्यांची भारत सरकारमध्ये नियोजनमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्याला पाटबंधारे व वीज खात्यांचा पदभारही देण्यात आला होता. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते मुंबईहून लोकसभेवर निवडून गेले आणि पुन्हा नियोजन, पाटबंधारे आणि उर्जामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५५ मध्ये सिंगापूर येथे आयोजित योजना सल्लागार समिती आणि १९५९ मध्ये जिनिव्हा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.