"गोपाळ कृष्ण गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''नामदार गोपाळ कृष्ण गोखले''' ([[मे ९]], [[इ.स. १८६६|१८६६]] - [[फेब्रुवारी १९]], [[इ.स. १९१५|१९१५]]) हे [[ब्रिटिश भारत|भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध]] कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने [[भारतीय स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्यलढ्याचा]] पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]चे आघाडीचे नेते व [[भारत सेवक समाज]] या संस्थेचे संस्थापक होते. [[मोहनदास करमचंद गांधी]] हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर चा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. राजकारणाला आध्यात्मिक करण्याचा महत्त्वाचाआध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजनीतिज्ञ होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टीकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निपक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. इंग्रजांच्या आगमनानंतर केवळ घटनात्मक मार्गाच्या आधारे ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. एकूणच गोपाळकृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिश धारजीॉना होता असे म्हणता येईल.
 
== बालपण ==