"केसरी (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ३९:
'''केसरी''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुणे शहरातून]] प्रकाशित होणारे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[दैनिक]] वृत्तपत्र आहे. [[जानेवारी ४]], [[इ.स. १८८१]] रोजी [[बाळ गंगाधर टिळक|बाळ गंगाधर टिळकांनी]] या वृत्तपत्राची सुरुवात केली.
==स्थापना==
लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी १८८१ मध्ये 'केसरी' हे वृत्तपत्र सुरू केले. 'केसरी' चे प्रथम संपादक [[गोपाळ गणेश आगरकर]] यांनी १८८८ पर्यंत काम केले.
आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व
==वाटचाल==
ओळ ५२:
'केसरी'च्या वृत्तपत्रीय कार्याचा आजपर्यंतच्या १३० वर्षांच्या या प्रदीर्घ काळातील वाटचालीचे अवलोकन करता इतिहासाचा अधिक धांडोळा घेणे मला क्रमप्राप्त वाटते. यातील जवळ जवळ ८० वर्षांच्या कालावधीत प्राधान्याने स्वातंत्र्यप्राप्ती व त्यानंतरचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या वातावरणात 'केसरी'चा काळ व्यतीत झाला आहे.
त्या काळात दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. अगदी १९६० पर्यंत रेडिओसुद्धा ग्रामीण भागात फारच दुर्मिळ होते. त्यामुळे जनसामान्यांसाठी प्रसारमाध्यमांचे काम 'केसरी' व इतर काही वृत्तपत्रांनी पार पाडले. स्वातंत्र्यप्राप्ती व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या व्यतिरिक्त देशात व राज्यात इतरही खूपच समस्या व प्रश्न होते. या प्रश्नांना ऐरणीवर आणण्याचे काम 'केसरी'ने केले. मुंबई-पुण्यासारखी मोठी शहरे वगळता तालुकास्तरीय व ग्रामीण भागात बहुसंख्य जनतेला जीवन जगताना प्लेग, देवी, नारू यांसारख्या रोगांच्या साथी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, वारंवार पडणारे
लोकमान्यांची 'केसरी'बाबतची भूमिका, राजकीय चळवळीस हातभार लागून राजकीय स्वातंत्र्याच्या उद्दिष्टपूर्तीनंतर सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचे प्रवाह या राष्टात व राज्यात वाहू लागणे अपेक्षित होती. 'केसरी'ने केवळ वृत्त किंवा लोकशिक्षण हे उद्दिष्ट न ठेवता जनतेला राष्टअभ्युदयासाठी कार्यप्रवण करणे हेही महत्त्वाचे कार्य पार पाडले आहे. 'केसरी'ने विचारवंतांवर छाप पाडली असे खास करून म्हणता येईल. टिळक युगात वृत्तपत्रातून ब्रिाटिश साम्राज्यशाही विरुद्ध स्वातंत्र्यचळवळीस अनुकूल विचार मांडीत राहणे ही खासच धैर्याची बाब होती. भारतात ब्रिाटिश राज्यकर्त्यांची भूमिका वृत्तपत्र स्वातंत्र्याला खुलेपणाची नव्हती. टिळकांनी ब्रिाटिशांशी झगडून वृत्तपत्र स्वातंत्र्य मिळविले. त्याबाबत त्यांच्यावर खटलेही झाले. या बिकट परिस्थितीतून 'केसरी'ची वाटचाल सुरूच होती.
टिळक युगानंतर 'केसरी'ने गांधीयुगातून जात स्वातंत्र्य मिळेपर्यंत कठीण परिस्थितीतून लोकजागृतीचे महत्त्वाचे कार्य सुरूच ठेवले. न. चि. केळकरांनीही विविध विषयांशी संबंधित वैचारिक लिखाण करून 'केसरी'ची प्रतिष्ठा वाढविली. त्याद्वारे सामाजिक विचारधनात मोलाची भर घातली. आचार्य जावडेकर यांनी गांधी आणि टिळक या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या विचारांचा सुयोग्य समन्वय घडवून समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला.
देशाला स्वातंत्र्य मिळाले. 'केसरी' व इतर बऱ्याच वृत्तपत्रांची जनजागृतीच्या पर्वाची विजयी सांगता झाली. लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक तसे १९४५ पासून 'केसरी'च्या कामात संपादन करीत होते; परंतु देशात फाळणीच्या दंगली, गांधीहत्या या घटना घडून राष्टाला स्थिरतेचे वातावरण मिळाले नव्हते. तशातच
'केसरी'च्या कार्यभारात दीपक जयवंतराव टिळक व त्यांचे पुत्र रोहित टिळक यांचा मोठा वाटा आहे. जयंतराव टिळकांनी किल्ल्यांच्या परिक्रमाची आवड जोपासली होती. वाचकांमध्येही किल्ल्याविषयीच्या पर्यटनासाठीची आवड त्यांनी निर्माण केली. दीपक टिळकांनी जयंतरावांची विचारधारा टिकवून ठेवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत 'केसरी'चे रूप पालटविले. व हा केसरी लोकांना खूप उपयोगी झाला<ref>[http://www.dailykesari.com/sund2.html Google's cache of शंकरराव कोल्हे] It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT.</ref>{{मृत दुवा}}
|