"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' [[शब्द]]समूहाला '''वाक्य''' म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[वर्ण]], [[शब्द]] व [[व्याकरण]]) एक आहे.
 
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण [[वर्ण]] असे म्हणतोम्हणतात. हे [[ध्वनी]] कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतोवापरतात. ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतोम्हणतात. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून '[[बदक]]' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदपदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.

मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषत: नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).

हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) मराठीतीलवाक्यातील एकएकेक पद हे एकाएकेका शब्दाचेशब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेवून) वाक्य बनते.
 
==[[केवल वाक्य]]==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाक्य" पासून हुडकले