"जयपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ २५:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''जयपूर''' हे [[राजस्थान|राजस्थानची]] राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या [[जयपूर संस्थान|संस्थानाचेही]] राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना [[इ.स. १७२८]] मध्ये [[महाराजा जयसिंह द्वितीय|दुसऱ्या महाराजा जयसिंह]] यांनी केली. येथील लोकसंख्या [[इ.स. २००३]] मध्ये जवळजवळ २७ लाख होती. जगभरातील 167 जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामाविष्ट झालेले जयपूर हे देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. राजा सवाई जयसिंग यांनी वाढती लोकसंख्या आणि पाण्याचे दुर्भिक्ष यावर मात करण्यासाठी 17 27 मध्ये आपली राजधानी अमेरहून जयपुर येथे आणली. वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांनी रचना केलेले हे शहर नगर नियोजन आणि मध्ययुगीन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या रंगा मागेही एक कथा आहे. प्रिन्स अल्बर्ट च्या स्वागतासाठी राजा सवाई रामसिंग दुसरे यांनी शहरातील सर्व वास्तू टेराकोटा गुलाबी रंगात रंगून घेतल्या होत्या. भेटीनंतर ही रंग कायम ठेवण्यासाठी कोणत्याही इमारतीला अन्य रंग देणे अनधिकृत ठरवणारा कायदा करण्याचा सल्ला राणीने राजाला दिला. हा नियम आणि त्यामुळे जयपूरचे गुलाबी शहर हे विरुद्धही आज कायम राहिलेले आहे. जयपूरमध्ये अनेक प्रेक्षणीय वास्तू स्थळे आहेत. अमर किल्ला हा जयपूरमधील सरोवराच्या काठी उभ्या असलेल्या या किल्ल्यावर मुगल वास्तुकलेचा प्रभाव आहे किल्ल्याचे बांधकाम लाल वालुकाश्म आणि संगमरवरात करण्यात आलेले आहे. येथील शीश महल अतिशय सुंदर आणि देखना विभाग आहे. सध्या त्याच्या जतन आणि संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे.
जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे. जगभरातील जगभरातील जगभरातील
|