"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
== सुरुवातीचे जीवन आणि पहिली कामगिरी ==
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी [[पुणे]] येथे झाला. [[थोरले बाजीराव पेशवे]] हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती '''नानासाहेब''' म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच [[मराठा]] छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा [[सातारा]] येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.{{संदर्भ हवा}} त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक [[२५ सप्टेंबर]], [[इ.स. १७५०]] रोजी [[सांगोला]] येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
== राघोजी भोसल्यांचा ओडिशाओरिसा भागात साम्राज्य विस्तार आणि पेशव्यांविरुद्ध विद्रोह==
नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात [[राघोजी भोसले]] यांनी पुर्वपूर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठिकठीक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस अगोदर राघोजींनी आपली एक फौज [[तंजावुरचेतंजावरचे मराठा राज्य|तंजावूरच्यातंजावरच्या प्रतापसिंगांना]] मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे [[अली दोस्त खान]]ला संपवून राघोजींनी [[अर्काटचे राज्य|अर्काट राज्याच्या गादीवर]] नवाब म्हणून [[सफदर अली खान]]ला बसविले. तदनंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले. पण मार्च १७४१ मध्ये अर्काटच्या गादीवर हक्क सांगण्याऱ्या [[चंदा साहिब]]ने (जो [[अली दोस्त खान]]चा जावई होता) दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले. फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजीविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले. साताऱ्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचंशमायचे नाव घेत नव्हता.
 
१७४३ मध्ये राघोजींनी [[ओडिशाओडिसा]] प्रांतात मराठी सैन्य घुसवून [[अलिवर्दी खान]]वर जबरदस्त हल्ला चढवला आणि [[ओडिशाओडिसा]], तत्कालीन [[बिहार]] आणि बंगाल प्रांतात [[चौथाई व सरदेशमुखी]] वसूल करण्यास सुरुसुरुवात केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओडिशाओरिस आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले.
 
१७४३ मध्ये राघोजींनी [[ओडिशा]] प्रांतात मराठी सैन्य घुसवून [[अलिवर्दी खान]]वर जबरदस्त हल्ला चढवला आणि [[ओडिशा]], तत्कालीन [[बिहार]] आणि बंगाल प्रांतात [[चौथाई व सरदेशमुखी]] वसूल करण्यास सुरु केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओडिशा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले.
== ताराराणी आणि उमाबाई दाभाड्यांचा विद्रोह ==
[[छत्रपती राजाराम]]च्या पत्नी [[महाराणी ताराबाई]] ही [[छत्रपती शाहूराजे भोसले]] यांची प्रतिस्पर्धी होती आणि त्यांच्याशी तिचे आणि कोल्हापूरकर छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आहेत असा भासवायचा प्रयत्न करुकरू लागली. शाहू महाराजांच्या उतरत्या काळात ताराबाईंनी एक मुलगा त्यांच्यासमोर पेश केला [[राजाराम दुसरे|छत्रपती राजाराम (द्वितीय)]]. आणि हा ताराबाईंचा नातू आहे असंअसे त्यांनी शाहू महाराजांना सांगितले म्हणजेच शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे. शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले आणि उत्तराधिकारी घोषित केले. १७४९ साली [[छत्रपती शाहूराजे भोसले]] यांच्या निधनानंतर [[महाराणी ताराबाई]] आणि नानासाहेब पेशव्यांच्या उपस्थितीत [[राजाराम दुसरे|छत्रपती राजाराम (द्वितीय)]] यांचा साताऱ्यात राज्याभिषेक करण्यात आला. पुढच्याच वर्षी नानासाहेब पेशवे दक्षिणेत [[निजाम राजवट]]ीवर मोठी फौज घेऊन चालून गेले. या संधीचा फायदा उठवत ताराराणींनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर करा अशी छत्रपतींना गळ घातली. पण छत्रपतींनी या गोष्टीस नकार दिला. त्यांनी नकार देताच २४ नोव्हेंबर १७५० रोजी ताराराणीने सातारला वेढा टाकला आणि खुद्द छत्रपतींना अंधारकोठडीत कैद केले. पेशव्यांना बंडाची आणि छत्रपतींच्या अटकेची खबर मिळताच खुद्द पेशवे, [[मल्हारराव होळकर]]सह फौज घेऊन सातारवर आपल्या धन्याची सुटका करण्यास निघाले. ताराबाईने छत्रपती हा एक तोतया आहे अस जाहिरजाहीर केले. पण मंत्रीमंडळमंत्रिमंडळ आणि बहुतांश सरदारांनी पेशव्यांचा आणि छत्रपतींचा पक्ष स्वीकारला. सरतेशेवटी आपली हार होणार हे पाहताच ताराबाईने [[उमाबाई दाभाडे|उमाबाई दाभाड्यांची]] मदत घेतली.
 
[[उमाबाई दाभाडे]] ही दाभाडे घराण्यातली एक कर्तबगार स्त्री होती. तिचे पती मुघलांशी लढताना ठार झाले होते तर तिचा मोठा मुलगा हा छत्रपतीविरुद्धच्या बंडात ठार झाला. दाभाडे घराण्यातली काही माणसांनी ''सरसेनापती'' ही पदवी ग्रहण केली होती. बंड शमल्यानंतर शाहूराजांनी उदारता दाखवत दाभाड्यांना माफ केले एका अटीवर ती अट म्हणजे गुजरातेत जे काही उत्पन्न होईल त्याचा अर्धा भाग हा सातारच्या (राज्याच्या) खजिन्यात जमा करावयाचा आणि उमाबाईंना ''सरसेनापती'' ही पदवी दिली.
Line ५६ ⟶ ५७:
 
==पुरस्कार==
पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’[[श्रीमंत]] नानासाहेब पेशवे धार्मिक आणि अध्यात्मिकआध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. [[यू.म. पठाण]] आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते.
 
==पुस्तक==