"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४४:
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी [[पुणे]] येथे झाला. [[थोरले बाजीराव पेशवे]] हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती '''नानासाहेब''' म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच [[मराठा]] छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा [[सातारा]] येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.{{संदर्भ हवा}} त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक [[२५ सप्टेंबर]], [[इ.स. १७५०]] रोजी [[सांगोला]] येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
== राघोजी भोसल्यांचा ओडिशा विस्तार आणि पेशव्यांविरुद्ध विद्रोह==
नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात [[राघोजी भोसले]] यांनी पुर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठिक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस अगोदर राघोजींनी आपली एक फौज [[तंजावुरचे मराठा राज्य|तंजावूरच्या प्रतापसिंगांना]] मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे [[अली दोस्त खान]]ला संपवून राघोजींनी [[अर्काटचे राज्य|अर्काट राज्याच्या गादीवर]] नवाब म्हणून [[सफदर अली खान]]ला बसविले. तदनंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले. पण मार्च १७४१ मध्ये अर्काटच्या गादीवर हक्क सांगण्याऱ्या [[चंदा साहिब]]ने (जो [[अली दोस्त खान]]चा जावई होता) दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले. फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजीविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले. साताऱ्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचं नाव घेत नव्हता.
 
==समाधी==