"रामोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दुवे जोडले खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
दुवे जोडले खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ६४:
सासवड,भिवरी, किकवी या भागात उमाजीने प्रचंड
लुटालूट करुनसरकारला जेरीस आणले. आता उमाजी रामोशाला पकडल्या शिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणारच नाही अशी जाणीव झाल्यावरच इंग्रज
सरकारने विशेष घोडदळ तयार करून मोक्याच्या ठिकाणी चौक्या बसविल्या.परंतु फायदा झाला नाही. ( संदर्भ- डॉ. दिनेश मोरे -पूर्वोक्त- पान क्र.१२९ )
उमाजीला सरकारच्या हालचालीची खडानखडा माहिती मिळत असे.इंग्रजांनी ओळखले की
उमाजीला गावातील प्रतिष्ठित लोकांचा पाठिंबा असलाच पाहिजे. एका अहवालात इंग्रज अधिका-याने लिहिले होते की " वाई व पुणे येथील ब्राम्हण लोक उमाजीला अनुकूल
असल्याचे दिसतात. भोरच्या पंत सचिवाचे आणि उमाजीचे वैर असूनही सचिवाचा कारभारी 'दामाजी' हा
उमाजीला अनुकूल आहे,आणि भोर येथील सर्व बातम्या
सांगतो. "(सदर्भ:- डॉ. दिनेश मोरे - उपरोक्त , पान क्र.१३०) उमाजी रामोशांच्या आडून पुण्याचे ब्राम्हण लोक
पेशवाईच्या पुनरूज्जीवनाचे स्वप्न पहात आहेत, अशी
शंका इंग्रजांना आल्यास नवल नव्हते. कारण इ.स १८७५
मध्ये डॉ. जाँन विल्सन यांनी एक विधान केले होते की
" महाराष्ट्रात ब्राह्मणाचे राज्य प्रस्थापित व्हावे अशी महाराष्ट्रातील ब्राह्मणाची फार दिवसाची महत्वकाक्षां-
आहे "(संदर्भ:- एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राची
सामाजिक पुनर्घटना, वाळींबे वि. स. - पान क्र.९०)
पुण्याचा कलेक्टर राँबर्टसन रामोशांच्या उठावा
संबधाने मुबंई गव्हर्नरला लिहितो की " युरोपियना विषयी
असंतोष, तिरस्कार उत्पन्न करणे व नंतर त्यांना देशातून घालवून देण्यासमदत करणे असा या लोकांचा मानस
दिसतो. पुण्यातील लोक ऊघड बोलतात की 'कुठे आहे
इंग्रजाचे राज्य? समरांगणावर ते लढतीत, पण रामोशांच्या पुढे त्यांचा निभाव लागणार नाही. कुणी सांगांव उद्या हा उम्याच शिवाजी सारखा बंडखोर होउन पुन्हा मराठी राज्य चालू करणार नाही कशावरुन ? देवाच्या मनात असेल तर काय होणार नाही."(संदर्भ;-
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे -खोबरेकर वि. गो.-पान ४३)
तिस-या जाहीरनाम्यात उमाजीला इंग्रजांनी " दरोडे-
-खोर "असा शब्द वापरला नाही तर " बंडवाला "असे म्हटले.उमाजीच्या कार्याचा उद्देश आता त्यांच्या लक्षात
आला होता .कँ. मँकिटाँश म्हणतो " उमाजी हा काही भटक्या वा दरोडेखोर नव्हे, त्याच्यापुढे शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी प्रमाणेच आपणही मोठे व्हावे
राज्य कमवावे अशी त्याची जिद्द होती."(संदर्भ:- कथा स्वातंत्र्यांची - पान क्र. २) उमाजीने स्वत:ला "राजे "
म्हणवुन घेण्यास सुरुवात केली होती. कुठल्या तरी
डोंगर कपारीत लोक जमत,तोच त्यांचा दरबार असे.
गोर-गरिबांना दक्षिणा देणे, दान देणे असे कृत्य तो करु
लागला. विशेष म्हणजे त्याच्या सोबत परदेशी, कुणबी,
मुसलमान व इतर जातीतले लोक असत. (संदर्भ:-डॉ.
दिनेश मोरे, पुर्वोक्त पान. क्र १३०)
|